Tuesday, 11 February 2020

सिरीयल किलिंग आणि ज्योतिष शास्त्र (Serial killing and Vedic Astrology)


प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. माणसाच्या स्वभावातले दोष समजून घेऊन आपण त्यानुसार कोणाशी जुळवून घेतो किंवा कधी कधी स्वतःमध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतो. काही दोष हे समजून घ्यायच्या पलीकडले असतात. उदा: मनुष्य हत्या. काही विशिष्ट कारणानं मनुष्याच्या हातून दुसऱ्या माणसाची हत्या होते. पण आज जगात असे अनेक गुन्हेगार आहेत जे काही काळाच्या अंतरानं संबंध नसलेल्या अनेक व्यक्तींची हत्या करतात, ज्याला दृश्य कारण नसलं तरी मानसिक दोष हेच कारण दिसून येतं. अशा गुन्हेगारांना सिरीयल किलर किंवा साखळी हत्या करणारा असं म्हटलं जातं. भारतात हा प्रकार कमी असला तरी दुर्मिळ नक्कीच नाही. ह्या अशा हत्यांचा मनुष्य स्वभाव आणि त्या अनुषंगानं ज्योतिष शास्त्राशी काय संबंध येतो यावर आज मी माझे विचार मांडणार आहे. 

प्रथम साखळी हत्या म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. जेव्हा एखादी व्यक्ती एक हत्या करून थांबत नाही तर काही काळानं दुसरी मग काही काळानं तिसरी अशा हत्यांचं सत्र चालूच ठेवते त्याला साखळी हत्या म्हटलं जातं. पण एकाच वेळी अनेक माणसांची हत्या केली तर त्याला सामूहिक हत्या म्हटलं जातं. त्यानंतर तो गुन्हेगार परत हत्या करेलच अशी शाश्वती नसते. जगात जवळपास प्रत्येक देशात साखळी हत्या करणारे गुन्हेगार आहेत. पण त्यांची सर्वात मोठी संख्या मात्र अमेरीकेत आहे. मी हा विषय निवडण्यामागचं खास कारण म्हणजे जगातील सर्वात लहान वयाचा सिरीयल किलर दुर्दैवानं भारतीय आहे. बिहारमधील अमरदीप सदा (फोटो पहा) ह्या आठ वर्षीय मुलानं ३ बालकांची हत्या केली ज्यात त्याच्या आठ महिन्यांच्या सख्ख्या बहिणीचाही समावेश होता. जगातील अनेक १० वर्षांपासूनची मुलं ह्या गुन्ह्यात सापडली आहेत. इतक्या लहान वयात देखील इतका मोठा गुन्हा कसा घडू शकतो असा प्रश्न आपल्याला नाही पडला तरच नवल.    

  

मनुष्य हत्येमागे गुन्हेगारांच्या ज्या भावना असतात त्या राग, द्वेष, सूड, आर्थिक फायदा, फसवणूक, शारीरिक आकर्षण अशा प्रकारच्या असतात. बऱ्याचदा एका लक्ष्य केलेल्या व्यक्तीला मारून त्या भावना थांबतातही. पण सिरीयल किलर्स मध्ये ह्या भावनांचा ओघ चालूच असतो. मानवहत्येचा ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर काही ग्रह / योग विशेष करून समोर येतात. कुंडलीतील 'गण' हा भाग मी सर्वप्रथम विचारात घेतला आहे. देव, मनुष्य आणि राक्षस अशा तीन गणांत मनुष्य स्वभावाची वर्गवारी झाली आहे जी चंद्र रास आणि नक्षत्रावर अवलंबून असते. नावाप्रमाणेच राक्षसगणी मनुष्य थोडा कडक स्वभावाचा असतो आणि कमी भावनाशील असतो. जेव्हा चंद्र बिघडल्यानं याचा अतिरेक होतो तेव्हा मनुष्य हत्येपर्यंतही या व्यक्तींची मजल जाते. याला वाईट मंगळाची साथ असेल तर हत्या करण्याचे विचार पूर्णत्वाला पोचतात. मंगळ हा धैर्य देतो, रक्ताचा कारक आहे पण तो बिघडला असेल तर अशी क्रूरकृत्य केली जातात. अर्थात हत्या करण्यामागे जी कारणं आहेत त्या कारणांशी संबंधित ग्रह व योग तितकेच वाईट असले पाहिजेत. उदा: जर एकतर्फी प्रेम वा शारीरिक संबंधातून हत्या घडली तर शुक्र बिघडलेला असतो. जर आर्थिक व्यवहारातून हत्या घडली तर कुंडलीतील धनेश, गुरु हे बिघडलेले असतात. राहू आणि केतू या पापग्रहांचा विचार अतिशय महत्त्वाचा ठरतो. चंद्र किंवा मंगळ यांचा राहू, केतू किंवा क्वचित शनिबरोबर संबंध आल्याशिवाय मन इतकं वाईट विचार करत नाही. मनाचा कारक चंद्र बिघडणं हा हत्येसारख्या गुन्ह्यांच्या मागील प्रथम व अनिवार्य कारण आहे. चंद्र सुस्थितीत असेल तर हत्येसारखा गुन्हा घडत नाही. किंबहुना अशी कोणतीही कुंडली माझ्यासमोर आली नाही. कुंडलीतील रवि हा एक मुद्दा थोडा दुय्यम असला तरी विचारात घेण्यासारखा आहे. रवि राग, अतिरेकी भावना तर देतोच पण राहू वा केतू बरोबर अंशात्मक युतीमध्ये असेल तर सुडाची भावना असते. अशा वेळी अनेक दिवस राग मनात ठेवून मग हत्या केली जाते अशी अनेक उदाहरणं आहेत. 

सिरीयल किलर्सचा विचार करायचा तर अनेक मुद्दे विचारात घेतले जातात. पहिला मुद्दा येतो तो त्यांच्या पार्श्वभूमीचा. जवळपास सगळ्याच सिरीयल किलर्सचं लहानपण हे सुखी घरातलं नसतं. आईवडिलांचं वेगळं होणं, भांडणं, व्यसनाधीनता, आई वडील चांगले पालक न असणं असे अनेक मुद्दे यात येतात. माझ्या मते लहानपणी जेव्हा मेंदूचा विकास होत असतो तेव्हा अशी काही दृश्य पाहून मनावर विपरीत परीणाम होणं साहजिकच आहे. काही मानवतावादी लोकांच्या मते लहानपणच्या गोष्टींशी मोठेपणी केलेल्या हत्यांशी संबंध कसा जोडता येईल? मी मनुष्य हत्येला कोठेही दयाभाव दाखवत नाही. पण लहानपणी मनावर झालेल्या आघातांवरच आपला स्वभाव ठरत असतो हे माझं मत आहे. सुस्थितीत, आपुलकीमध्ये वाढलेली मुलं शक्यतो असे गुन्हे करत नाहीत. आणि केलेच तर ती दर्शनी सुस्थिती आतून वेगळीच असते. लहानपणी बघितलेल्या वाईट नाते संबंधांमुळे मनात एखाद्या व्यक्ती / नातं / स्त्री वा पुरुष लिंगी व्यक्तीबद्दल तिरस्कार असतो. ज्याचे पडसाद कधी लहानपणीच उमटतात तर कधी मोठेपणी. वेळेवर उपचार केले तर ह्यातून बाहेर पडता येईलही. पण त्यांचा संबंधच केलेल्या हत्येशी नाही हे मला पटत नाही. उमलत्या वयात अशी दृश्य पाहून कठोर किंवा भावनाहीन स्वभाव तयार होतो. म्हणूनच कौटुंबिक स्थितीला आपण सर्वजण मानतो. वयानुसार होणारे संप्रेरकांचे बदल आणि अशी परीस्थिती यांचं अतूट नातं आहे. ज्या लहान मुलांनी साखळी हत्या केल्या आहेत ते लहानपणीच अशा वातावरणामुळे घरातून बाहेर पडतात किंवा दारू / गर्दच्या आहारी जातात. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं पाहायचं तर अनेक सिरीयल किलर्सना अशा परिस्थितीत राहावं लागलं, आई किंवा वडील कोण आहेत याचाच पत्ता नव्हता, पालकांची सततची भांडणं, वेगळं होणं किंवा अनैतिक संबंध, वैवाहिक बलात्कार अशा अनेक प्रसंगांना सामोरं गेल्यानं भावना उमलत्या वयातच कोमेजून गेल्या. त्यांच्या कुंडलीत कुटुंब स्थान बिघडलेलं असणं अगदी नियमित गोष्ट होती. मातेचा आणि मनाचा कारक चंद्र बिघडलेला असून पित्याचा कारक रवि अत्यंत वाईट स्थितीत होता. कौटुंबिक सौख्याच्या अभावामुळे प्रेम काय असतं याची कल्पनाच यांना नव्हती. चंद्र आणि मंगळ यांच्या विचित्र योगांमुळे क्रौर्य विकसित झालं. ही मुलं लहानपणी प्राणी, प्राण्यांचे मृतदेह यांची विटंबना करतात. त्यातील आसुरी आनंद कुंडलीतील चंद्र प्रतिबिंबित करतो.       

कौटुंबिक अन्यायात प्रामुख्यानं एक मुद्दा पुढे येतो तो म्हणजे लैंगिक अत्याचार. लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांचं प्रमाण पश्चिमी देशांत थोडं जास्त असलं तरीही भारतात याचं प्रमाण नक्कीच विचारात घेण्याइतपत आहे. आपल्या समाज संस्थेमुळे याला अनेकदा वाचा फोडली जात नसली तरी हे प्रमाण काही नगण्य नाही. अनेक सिरीयल किलर्स लहानपणी ह्या दुर्दशेतून गेले आहेत. आणि ह्याच मुळे त्यांच्या भावना निरागस राहिल्या नाहीत. दुर्दैवानं घरातूनच याची सुरुवात होते आणि पुढे ही मुलं डोळ्यासमोर तीच चित्रं ठेवून वाईट वर्तन करतात. ज्या लिंगी व्यक्तीनं त्यांच्यावर अत्याचार केले होते त्या लिंगी व्यक्तींना छळून त्यांची हत्या केली जाते. मानसशास्त्रानुसार असे अन्याय करताना ते गुन्हेगार त्यांच्यावर झालेले अन्याय आठवून त्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीलाच जणू त्रास देत आहोत अशा भावनांमध्ये जगतात. काही तज्ज्ञांच्या मते हे सिरीयल किलर्स भावनाशून्य असतात. माझ्या मते ते भावनाशून्य नसून केवळ सूडाच्या भावनेनं पेटलेले असतात. जवळपास सर्वच सिरीयल किलर्स ह्यामुळे लैंगिक छळ करून हत्या करतात किंवा विशिष्ट लिंगी व्यक्तींच्या हत्या करतात. त्यांना आपण काय करतो आहोत याची पूर्ण जाणीव असते अन्यथा ते वेडेपणाने ग्रासले आहेत असं म्हणता येईल. पण ते आयुष्यात इतर वेळी इतके चांगले वागतात, नोकरी / व्यवसाय करतात, लग्नंही करतात पण ही सुडाची भावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही. 

समलैंगिकता हाही एक महत्त्वाचा मुद्दा यात येतो. समलैंगिकतेला अजूनही अपमानास्पद वागणूक मिळत असल्यानं अनेक गुन्हेगार समलिंगी व्यक्तींची हत्या करतात. आपण समलैंगिक आहोत हे समाजाला कळू नये म्हणून हे टोकाचं पाऊल उचललं जातं. समाज, धर्म, पालकांचे विचार यांचा पगडा हे यामागील प्रमुख कारण. घरातीलच समलिंगी व्यक्तीनं केलेले अत्याचार हेही यासाठी कारणीभूत ठरतात. धार्मिक स्थळं, चित्रपट क्षेत्र अशा अनेक ठिकाणी समलैंगिक अत्याचार सर्रास होत असतात. लहान मुलांनी याला वाचा फोडली तरी पूर्वी याकडे दुर्लक्ष केलं जात असे. पण आता याबद्दलचे कायदेही बदलले आहेत आणि पालकही जागरूक होत आहेत. त्यामुळे आता असे अत्याचार कमी झाले आहेत. 

वरील दोन्ही मुद्द्यांमध्ये कुंडलीतील शुक्र, चंद्र आणि मंगळ हे प्रमुख ग्रह आहेत जे अशा गुन्ह्यांसाठी कारणीभूत आहेत. पालकत्व म्हणजे नुसतंच जन्म देणं नव्हे हे ज्यांना समजत नाही असे पालक असल्यानं अशा गुन्हेगारांचं कुंडलीतील कुटुंब स्थान बिघडलेलं असतं. त्यात मंगळाची भर पडली तर हत्येसारखा गुन्हा घडतो. अशुभ शुक्र, सप्तम स्थान अशुभ योगात असणं ही कुंडलीतील प्रमुख कारणं आहेत. कुटुंब स्थानचा स्वामी शुभ ग्रह असला तरी पाप कर्तरी योगात असतो किंवा पाप ग्रहांनी दृष्ट असतो. जेव्हा अशुभ ग्रहांच्या महादशा - अंतर्दशा असतात तेव्हा हे गुन्हे प्रत्यक्षात घडतात. या शिवायही अनेक कारणांमुळे असे गुन्हे घडतात, मी प्रमुख कारणांचा इथे विचार केला आहे. 

आता प्रत्यक्ष साखळी हत्येमागील गुन्हेगारांनी दिलेली कारणं पाहू. बहुतांशी गुन्हेगारांच्या मते साखळी हत्या ही लैंगिक समाधान, द्वेष वा राग यापेक्षा दुसऱ्याला ताब्यात ठेवण्यासाठी असते. आपण एखाद्यावर अत्याचार करतो म्हणजे त्याला सुटकेचा वाव देत नाही. इथे आपण त्या बळी जाणाऱ्या व्यक्तीला कसं ताब्यात ठेवलं आहे ही भावना खूप सुखावते. अशा अबल, निःशस्त्र व्यक्तीला छळून लहानपणी जे अत्याचार झाले आहेत ते पुन्हा जगले जातात. मानसिक संतुलन बिघडल्यानं (वेड नाही) आपल्यावरील अन्यायाचा पुन्हा पुन्हा विचार केला जातो आणि अशी कृत्य घडतात. हे गुन्हेगार ओलिस ठेवलेल्या व्यक्तीला माणूस नाही तर एक वस्तू समजतात. कुंडलीतील बिघडलेला चंद्र जर राहू किंवा केतू युक्त असेल तर अशी भावना तयार होते. कारण राहू हा सूडाची भावना देतो आणि केतू एखाद्या व्यक्तीला निर्जीव वस्तू समजून त्याचा छळ करण्याची मानसिकता देतो. राहूमुळे हत्या करणं हे एक अन्यायाचा सूड घेण्याचं तंत्र ठरतं. आणि केतू माणुसकी नष्ट करतो. म्हणूनच कुंडलीतील हे योग खूप महत्त्वाचे ठरतात. बिघडलेला मंगळ असेल तर रक्तपाताला न घाबरता अशा हत्या करण्याचं सामर्थ्य मिळतं. चलित गुरु, राहू, केतू आणि रवि यात महत्त्वाचे ठरतात. तसंच हा अन्याय गुन्हेगारावर झालेला असल्यानं शुक्र वक्री किंवा अशुभ असतो.                

काही गुन्हेगारांच्या म्हणण्यानुसार समलैंगिकतेमुळे त्यांच्या भावना कधीच व्यक्त झाल्या नाहीत. म्हणून एखादी समलैंगिक व्यक्ती आयुष्यात आली तर ती जाऊ नये म्हणून त्या व्यक्तीला मारून तिच्या शरीराचे काही भाग कापून जवळ ठेवले जातात किंवा त्या व्यक्तीचं शव जवळ ठेवलं जातं. जेणेकरून ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांच्या संपर्कात आहे असं वाटतं. अशावेळी शुक्र हा विशेष भूमिकेत येतो. अत्यंत वाईट स्थितीतला शुक्र आणि मंगळ यामुळे समलैंगिक गुन्हेगार या मार्गाकडे वळतात. मानसिक असमाधान हे कारण जरी असलं तरीही ते लैंगिक बाबतीत असल्यानं शुक्र प्रमुख भूमिकेत येतो. जर बळी जाणाऱ्या व्यक्तीचा छळ केला गेला तर पुन्हा राहू आणि केतू कारणीभूत असतात. समलैंगिकतेमुळे आलेला एकटेपणा, समाजानं वाळीत टाकणं अशाही घटना यांच्याबरोबर घडतात. यामुळे अशा घटनांमध्ये शनिचा विचार केला जावा असं माझं मत आहे. शनि एकटेपणा देतोच पण प्रचंड नैराश्य देतो. ज्यामुळे अकल्पित गोष्टी घडतात ज्याला नैराश्य आणि वाईट विचारांची साथ असते. शरीराचे अवयव कापून जवळ ठेवणं, ते खाणं ह्या कल्पना शनिसारख्या ग्रहामुळेच येऊ शकतात. केतू हा मानवी शरीराला एक निर्जीव वस्तू समजून त्याचे तुकडे करायचे या भावनेला कारणीभूत ठरतो. अशा प्रकारच्या कुंडल्यांमध्ये शनि - शुक्र - चंद्र - केतू यांचे योग दिसून येतात.         

काही गुन्हेगारांच्या म्हणण्यानुसार त्यांना वाईट शक्तींनी पछाडलेलं असतं. आणि त्या शक्ती त्यांना स्वप्नात किंवा प्रत्यक्षात आकाशवाणी वा अशाच काही प्रकारे आवाजाच्या माध्यमातून सूचना देत असतात असं ते म्हणतात. या मुद्द्यात मुख्यतः मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून असलेले आजार असतात. ज्यामधे स्कित्झोफ्रेनिया, दुहेरी व्यक्तिमत्व असे आजार असतात. याला मूळ कारण प्रामुख्यानं लहानपणी झालेले अन्याय हेच असलं तरी त्याची परीणीती ह्या रोगांमध्येच होते. काल्पनिक विश्व आणि प्रत्यक्ष आयुष्य याचा समन्वय साधला न गेल्यानं असे आजार होतात. मग गुन्हेगाराच्या पार्श्वभूमीनुसार त्याला सैतान, अदृश्य शक्ती इतकंच काय देवाकडूनही मनुष्य हत्या करण्याची आज्ञा झाली आहे असे भास होतात. असे आजार असतील तर ते गर्द, दारू अशा व्यसनांमुळे वाढतात किंवा नसले तर व्यसनांमुळे असे भास व्हायला सुरुवात होते. चुकीची औषधं घेणं किंवा डॉक्टरांना न विचारता औषधं वाट्टेल त्या प्रमाणात घेणं यामुळेही विकृती तयार होते. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं विचार करायचा तर बिघडलेला चंद्र आणि षष्ठेश वा षष्ठ स्थान यामुळे हे आजार उद्भवतात. यात मंगळाचा सहभाग असला तरी जाणून बुजून किंवा केवळ एक विकृती म्हणून हत्या केल्या जात नाहीत. तर काल्पनिक विश्वाच्या प्रभावामुळे आपण काय करतो आहोत हेच बऱ्याचदा त्यांना निदान त्या वेळी तरी समजत नाही. काही काळानं गुन्हेगारांना पश्चात्तापही होतोही पण पुन्हा ते त्याच मार्गाला जातात. म्हणजे चंद्र हा भावना नष्ट करतोच पण सारासार विचार बुद्धीही नष्ट करतो. बिघडलेल्या चंद्रामुळे त्यांचा भूतकाळ आणि काल्पनिक विश्व यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. राहू आणि केतूची भूमिका निदान या प्रकरणांत जरी दुय्यम असली त्यांचा प्रभाव असल्यामुळे हत्या घडतात. कधी कधी त्यांचं मन चंद्र, शुक्र आणि शनि सारख्या ग्रहांमुळे इतकं संवेदनशील झालेलं असतं की त्यांनीच हत्या केलेल्या व्यक्तींचे मृतदेह पाहून गुन्हेगारांना भीती वाटते आणि त्यातून बाहेर पाडण्यासाठी ते पुन्हा व्यसनांचा आधार घेतात. अशा गुन्हेगारांच्या कुंडल्यांमध्ये बारावं स्थान सुद्धा बिघडलेलं असतं. ज्यामुळे व्यसनं हा प्रमुख मुद्दा ठरतो. 

या विषयावर अभ्यास करताना एक खूप वेगळा मुद्दा माझ्यासमोर आला. अनेक सिरीयल किलर्सचे बुद्ध्यांक अतिशय उच्च होते. 'उनाबॉम्बर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणितात डॉक्टरेट मिळवलेल्या टेड कॅक्झिन्स्कीचा बुद्ध्यांक तर आईनस्टाईन यांच्यापेक्षाही जास्त होता. एडमंड केम्पर, जेफ्री डाहमर, डेनिस निल्सन अशा अनेक गुन्हेगारांचे बुद्ध्यांक चांगले होते. म्हणजे केवळ बुद्धीचा अभाव म्हणून अशी कृत्यं घडत नाहीत. तर अतिसंवेदनशील मनामुळे टोकाचे विचार केले जातात आणि त्यातूनच मानसिक आजार उद्भवून असे गुन्हे घडतात. बुद्ध्यांक उच्च असणारे गुन्हेगार हे टोकाचे अहंकारी असतात ज्यांना narcissistic म्हटलं जातं, ज्यात अगदी हिटलरचाही समावेश होतो. जॅक अंटरविगर उर्फ व्हिएन्ना स्ट्रँगलर आणि टेड बंडी हे गुन्हेगार म्हणजे याचं उत्तम उदाहरण. टोकाच्या अहंकारापायी त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. जॅक तर इतका हुशार, अहंकारी होता की पहिल्या हत्येच्या सत्रानंतर तो मोकळा सुटला (parole) आणि त्यानं हत्येच्या मानसिकतेवर आधारून आत्मचरीत्रही लिहिलं. त्याच वेळी तो इतर हत्याही करत होता. टेड बंडी अनेकदा तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाला, त्यानं तुरुंगात लग्नही केलं आणि पोलिसांना बुद्धिमत्तेच्या जोरावर फसवून बेकायदेशीररीत्या पत्नीशी तुरुंगात एकांतात भेटी घेतल्या आणि त्यांना एक संततीही झाली. स्वतःचा वकील म्हणून त्यानेच त्याचा दावा सिद्ध करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. त्याचे आजोबा (आईचे वडील) हेच त्याचे वडील होते ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावर त्याच्या मनात स्त्रीबद्दल एक तिरस्कार तयार झाला. त्यात त्याला एका मुलीनं लग्नासाठी नकार दिला आणि त्याचा अहंकार दुखावला. त्यामुळे हा अति अहंकारी माणूस एक सिरीयल किलर बनला आणि हत्या केलेल्या स्त्रियांच्या मृतदेहाशीही संभोग करण्याइतका विकृत बनला. ह्या सगळ्याचा ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर चंद्र आणि रवि बिघडलेले असले तरी उत्तम बुद्धिमत्ता देण्याइतके नक्कीच सुस्थितीत होते. म्हणजे या गुन्हेगारांना वेड लागलं आहे असं पूर्णतः आपण म्हणू शकत नाही. दुसऱ्याला फसवण्यासाठी लागणारा मुख्य ग्रह म्हणजे बुध. याच्या जोरावर हे गुन्हेगार वाक्चातुर्यात प्राविण्य मिळवतात. मात्र हे प्राविण्य वाईट गोष्टींसाठी वापरलं जातं हे दुर्दैव आहे. सप्तम स्थान आणि बुध यांचा संबंध वाईट दृष्टीनं आला की पौरुषत्व, अहंकार अशा गोष्टी वाईट मार्गानं उद्दीपित होतात. अशा गुन्हेगारांच्या बाबतीत लैंगिक अत्याचार हा मुद्दा कदाचित नसेलही पण स्त्रीकडून (विरुद्ध लिंगी व्यक्तीकडून) झालेला अपमान हा मुद्दा असतो. आई, पत्नी, प्रेयसी यांच्याकडून झालेला हा अपमान अशा मार्गांनी बाहेर पडतो. स्त्री गुन्हेगारांच्या बाबतीत बोलायचं तर एलिन वुर्नोस (फोटो पहा) हे ह्याचं उत्तम उदाहरण. लहानपणापासून अगदी स्वतःचा भाऊ आणि आजोबांचा मित्र अशा अनेक जवळच्या व्यक्तींच्या वासनेला बळी पडलेली ही गुन्हेगार अगदी मोकळ्या स्वभावाची होती. पण दुर्दैवानं आई वडिलांनी दुर्लक्ष केल्यामुळे लहानपणीच वेश्या व्यवसायात यावं लागल्यानं पुरुषांबद्दल तिला कमालीचा तिरस्कार होता. सात पुरुषांची हत्या केल्यानंतर ती पकडली गेली ज्यात तिनं विश्वासानं आपलं मानलेली तिची समलैंगिक मैत्रिण तिला धोका देऊन गेली आणि एलिनला पकडण्यासाठी पोलिसांना मदत करताना स्वतःची मात्र सुटका करून घेतली. पुरुषी वासनेला कंटाळून समलैंगिक बनलेल्या एलिनची कहाणी दुर्दैवी असली तरी तिची मानसिकता समजून घेतल्यास असे गुन्हे घडण्यामागील कारण समजू शकेल. अशा गुन्हेगारांच्या बाबतीत हा काही एका वेळीच झालेला अपमान असेल असं नाही. फार मोठा काळ यात घालवल्यामुळे त्यांची मनस्थिती अशी होते. 



काही गुन्हेगार लहानपणी डोक्याला मार लागल्याचं सांगतात. मेंदूला झालेली जखम आणि त्याचे हे परीणाम असल्याचं डॉक्टरही मान्य करतात. पण मला हे कारण फारसं पटत नाही. केवळ मेंदूला जखम झाली तर त्यात एखादाच व्यक्ती असे गुन्हे करेल असं माझं मत आहे. अनेक गुन्हेगार जेव्हा हे कारण देतात तेव्हा ते मला अनाकलनीय वाटतं. कारण ज्या गुन्हेगारांनी हे कारण दिलं त्यांचा बुद्ध्यांक चांगला होता.    

गुन्हेगारीमध्ये जनुकं किंवा पिढीजात दोष असतात का असा एक प्रश्न नेहमी मला विचारला जातो. माझ्या मते जनुकांमधले हे दोष काहीवेळा आपल्या क्षमतेच्या बाहेरचे असतातही. अशी काही गुणसूत्रं  / जनुकं आहेत ज्यावरून साखळी हत्या सारख्या गुन्ह्यांचा मागोवा आपण घेऊ शकतो. पण केवळ हे परीमाण म्हणजे या विषयाचा अंत नव्हे. किंवा असे दोष असणारे सगळेच गुन्हेगार होत नाहीत. अन्यथा असं संशोधन करून हे गुन्हे थांबवता येतील. पण असे दोष हे फक्त एकच परीमाण आहे, जे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे.  

लहानपणी झालेले अत्याचार असोत, कौटुंबिक स्थिती वाईट असो, मेंदूला लागलेला मार असो, जनुकीय दोष असो वा अन्य काही कारण असो, यातला प्रत्येक जण काही हत्या करत नाही. मग काही व्यक्तीच अशा हत्या का करतात? ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून याचं उत्तर द्यायचं तर कोणत्याही वाईट परिस्थितीचा मनावर होणारा परीणाम प्रत्येकावर सारखाच होतो असं नाही. प्रत्येकाची सहनशक्ती वेगळी असते. आपल्या आयुष्यातही आपण पाहतो की एखादं संकट आल्यास घरातील प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीनं त्याचा सामना करते. त्याचप्रमाणे गुन्हेगारी हा जन्मजात दोष असण्यापेक्षा परीस्थितीमुळे उद्भवलेला दोष असतो. मग अशा अति संवेदनशील व्यक्तींना व्यसनं, एकटेपणा अशा गोष्टींमुळे वाईट मार्गांची चटक लागते, त्यातलीच ही एक. कुंडलीतील चंद्र नक्की कोणत्या पद्धतीनं बिघडला आहे याचं निदान करणं खूप महत्त्वाचं आहे. शिवाय शनि आणि केतू हे फार महत्त्वाचे ग्रह बिघडले असतील तर नैराश्याची (शनि) परिणीती हत्येमध्ये होते (केतू). मानवता सोडून दुसऱ्या व्यक्तीला एक वस्तू आणि आपल्या सूडाचा एक मार्ग समजण्याची मानसिकता तयार होते. असे ग्रहयोगच गुन्हेगार घडवतात. उदा: टेड बंडीला ज्या मुलीनं लग्नासाठी नकार दिला तिच्यासारख्या दिसणाऱ्या ३० (+) मुलींची त्यानं हत्या केली. निचीचा चंद्र केतूने युक्त असा पंचमात, सप्तमेश शनि लग्नी आणि पंचमात ५ बिघडलेले ग्रह यामुळे प्रेमातील असफलतेमुळे त्यानं अशा हत्या केल्या. दृश्य कारण हेच असलं तरी आईबद्दलचा राग, आईचे तिच्याच वडिलांशी असलेले संबंध आणि त्यामुळे उध्वस्त झालेलं बालपण हे मूळ कारण नाकारून चालणार नाही. नाहीतर नकार मिळालेली प्रत्येक व्यक्ती गुन्हे करत नाही. स्वराशीचा शुक्र कुंडलीत केंद्रात असूनही टेड असा वागला.  

असो, मी अनेक प्रकारच्या कारणांमुळे तयार झालेले गुन्हेगार आणि त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून वरील मतं मांडली आहेत. यात एका क्षुल्लक कारणावरून असे गुन्हे घडत असल्याचं निदान माझ्या तरी निदर्शनाला आलं नाही. फार मोठा काळ आणि तोही आयुष्यातील महत्त्वाच्या वर्षांचा काळ अशा वाईट स्थितीत गेल्यानं असे गुन्हे घडतात असं माझं स्पष्ट मत आहे. पालकत्व किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला यावरून समजू शकेल. अर्थात याला प्रत्येक ठिकाणची संस्कृती, मोकळीक आणि विचारधारा हेही कारण असलं तरी मुलांची वाढ होताना त्यांना चांगल्या पद्धतीनं वाढवणं आणि चांगले पालक होऊ शकत नसतील तर मुलांना जन्मच न देणं अशा उपायांचा विचार व्हायला हवा. मुलांना नकार पचवण्याची सवय लावायला हवी आणि प्रेमानं / वेळ पडल्यास कठोरतेनं समज द्यायला हवी. याचंच उदाहरण म्हणजे भारतातील सर्वात लहान वयाचा सिरीयल किलर अमरदीप (८ वर्ष)  पकडला गेला तेव्हा त्याच्या पालकांनीच त्याला पाठिंबा द्यावा ही संतापजनक गोष्ट आहे. तसंच केवळ समाज काय म्हणेल म्हणून संतती प्राप्ती करून पुढे त्याचे परीणाम काय होतील याचा विचार न करणं हे चांगल्या पालकांचं लक्षण नाही. किंबहुना आपण एक चांगली पिढी घडवणार असू, तरच आपण पालक बनावं किंवा निदान संतती संख्या कमी असावी हे जरी वाचकांच्या लक्षात आलं तरी माझ्या अभ्यासाचं सार्थक झालं असं मी समजेन. जर दुर्दैवानं सुस्थिती असतानाही संकटं आली तर तो नशिबाचा आणि आपल्या संचित कर्माचा भाग असतो. पण विवेक बुद्धीनं आणि जागरूकतेनं वागल्यास आपण भविष्यातील गुन्हे रोखू शकतो हे आपण लक्षात घ्यावं. पालकांनी आपली कर्तव्यं पार पाडली तरीही अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे मुलं वाईट मार्गाला लागू शकतात. पण जे आपल्या हातात आहे निदान ते तरी आपण निश्चित करू शकतो. म्हणूनच बाकी मुद्द्यांवर न लिहिता मी पालकत्व या मुद्द्यावर भर दिला आहे.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
       ==============================================

Every person's nature is different. By understanding the flaws sometimes we try to adjust with somebody or try to change our self. Some taints are really difficult to tackle, for example killer instincts. Due to some virile reason a person kills another person. Nonetheless some people kill many strangers with some time interval without any apparent motive but mere psychological gratification. Such killers are called as serial killers. Serial killing is not common in India though it is not rare. When a killer kills many people at a time then he is known as a mass killer. But this may not be predictive that the killer will kill again. Serial killers exist almost everywhere in the world, but their number is much higher in USA. I specifically chose this topic as the youngest serial killer is (dismally) from India. Amardeep Sada (see photo) was only 8 years old when he committed this gruesome crime and killed 3 infants including his 8 months old sister. There are many kids in the world aging from 10 years who have become serial killers. Rather it will be a wonderment if we do not have this question raised in our minds that how these kids can commit such crimes at such a tender age. 



Practically speaking the psychological motives behind murders include extreme anger, jealousy, revenge, financial gains, cheating or physical attraction. Many time the rage stops by killing the targeted person. But in case of serial killers this emotional rage goes on and on. From astrological point of view some planets / yogas are prominent in cases of murders. The Gana in kundli matters a lot, which I have considered as the first criteria. Human nature has been divided in three Ganas Dev (God), Manushya (Human) and Rakshas (Demon), which depends on the Moon sign and the Nakshatra. As the name suggests people with Rakshasa Gana tend to be more strict and with lesser emotions. When Moon is debilitated and other yogas are extremely inauspicious then the person might commit a crime like murder. When inauspicious Mars also supports such Moon then the dark fantasies like murders actually eventuate in real life. Mars gives the courage and is also responsible for bloodshed, thus when it is inauspicious, it evokes such heinous crimes. Of course the planets responsible for the root cause of murders should be equally effective when such crimes occur. Like when murders occur due to physical attraction or one sided love, then Venus will come into picture and should be inauspicious. If murders occur due to financial reasons then the second house lord and Jupiter are deteriorated. The inauspicious planets like Rahu and Ketu (Paap grahas) are equally influential in these cases. The minds of the criminals becomes turbulent when Moon or Mars are in yogas with Rahu or Ketu or sometimes Saturn. Moon which governs our minds if situated in a bad position, becomes a prominent reason for the crimes like murders. If Moon in the kundli is very auspicious then it is highly unlikely that a crime like murder can occur. The position of Sun, though secondary when it comes to the crimes is definitely a point to be considered. Sun not only gives aggression but if it is in conjunction with Rahu or Ketu it gives revengeful thoughts. When such conjunctions are there in the kundli the criminals take a long time to commit the murders even though they have revengeful thoughts in their minds.

When it comes to serial killers many aspects come into play. The first and important one is the background of these criminals. Almost all the serial killers come from a dysfunctional family. There are many issues like separation of parents, disputes, addictions or problems in parenthood etc. I strongly feel when the brain of the child is growing the child is in a critical stage of life. Exactly at the same time when child faces such circumstances there are more chances that the child gets affected in a negative way. Some humanitarians claim that these traumas in childhood can not be related to the crimes committed in adulthood. I am not at all justifying human killing, but I have a clear opinion that the trauma in childhood definitely reflects in adulthood and plays a vital role in defining the nature of a person. The children raised in a good environment and affection will hardly turn towards such crimes. And if they do commit such heinous crimes then the apparent family situation is a hoax and some thing more must have happened behind the doors. The dysfunctional family background many times creates a hatred for a particular gender. Sometimes this hatred reflects in childhood and sometimes in adulthood. A good treatment can help these children if treated in time. But this is totally not related to the crimes like murders is not acceptable. When children experience such grating situations at the budding age they tend to become harsh and sometimes emotionless in the adulthood. This is the reason we respect family values. The hormonal changes of the children in growing age and such conditions have inseparable relation. The serial killers who have faced such situations usually leave the home at very young age or get addicted to drugs / alcohol. Thinking from astrological point of view many serial killers came from dysfunctional families and had to experience extreme circumstances like parental disputes, unawareness of biological parents, illicit relationships of family members or marital rapes etc. which withered their tender emotions at a very young age. The second house (family) in their kundlis was absolutely debilitated which was a very common factor due to obvious reasons. Due to such factors lack of affection was a prevailing factor. An inauspicious yog between Moon and Mars created cruelty and psychopathy in some cases. Mostly these children expressed their emotions by torturing animals or playing with animal carcasses. The evil emotions were reflected by the debilitated or inauspicious Moon in their kundlis. 

The dysfunctional family background also highlights one more point and that is sexual harassment. Though pedophilia is more common in western countries it is not uncommon in countries like India. Albeit it is not documented due to social pressure here but it is definitely not negligible. Most of the serial killers have gone through such devastating experiences and this explains why their tender innocent emotions were harmed. Sadly the pedophilia begins at home and these children whoi are victims, keep the same picture in front of their minds and behave inhumanely in future. They tend to torture or kill the people of same gender, which have traumatized them in their childhood. According to psychological analysis they relive the same torture and assume that they are torturing the same person. Some analysts think that serial killers are emotionless morons. But I think they are not emotionless but in fact have very strong emotions of revenge, though they become ruthless due to the trauma. Most of the serial killers prefer to torture the victims first and then kill them or attack victims of a particular gender, due to their traumatizing past. They are aware of what they are doing otherwise they can be categorized as insane. But in their day to day life they behave so normally like they work, get married and / or have kids but the revengeful thoughts cause the anxiety and disquietude.    

Sexual orientation precisely homosexuality is also a very important parameter here. Even today homosexuality is not accepted openly in our society. Thus many serial killers with homosexual orientation have killed their homosexual partners or victims of  same gender. Due to social pressure these criminals are bound to hide their feelings and the outrage results in killing or torture of the victims. The crub of society, religion or parental views puts immense pressure on the minds of homosexuals in many cases. As a consequence of this sexual assault sometimes begins at home. These kinds of assaults are especially common at religious places or in film industry. Decades earlier when children tried to expose these assaults they were either neglected or the children were pressurized. Thankfully today such harassment cases are not disregarded and parents also remain alert about the safety of their children. This has significantly reduced the number of such assaults.  

In both the above mentioned points Venus, Moon and Mars play a vital role and become responsible for the crimes related to sexual assaults. The killers who were once victims of such assaults have a very inauspicious second house and planets related to the house in their kundlis. The reason behind this is  their parents who do not understand the concept of 'parenthood', which is not just giving birth to the next generation. Inauspicious Venus and seventh house in the kundli are the primary reasons behind such consequences. Even if the lord of the second house is a good planet it is placed in the 'pap kartari' yog or aspected by some powerful inauspicious planet. The crimes actually occur when the Mahadasha or Antardasha of such inauspicious planets are running. There are numerous external reasons behind the heinous crimes but I have focused on major reasons affecting the criminals' minds. 

Now lets consider the reasons given by the serial killers which according to them, 'compelled' them to commit the crimes.  Most of the killers stated that serial killing is not about sexual pleasures, jealousy or anger but it is all about having full control over the victim. While torturing the victims they get a feeling that victims can not escape the situation and this possession gives the killers a strange pleasure. The killers relive the same tortures which they had faced in their childhood by re enacting using helpless victims. The disturbed minds of the criminals (not insanity) recollect those bad memories again and again and thus repeat the torture procedures on the victims. They abduct the victims and consider them as their slaves or non living toys. When Moon in the kundlis of such criminals is debilitated or in conjunction with Rahu or Ketu, boosts the psychopathy. As Rahu supports the feeling of revenge and Ketu makes them consider other human as a non living thing. Rahu supports the dark fantasies of killing, which is taken as a way of getting revenge and Ketu makes them inhumane. This is why these planets are vital while analyzing the kundlis of serial killers. If inauspicious Mars supports such yogas then it removes the fear of bloodshed and encourages for killings. Horary Jupiter, Rahu, Ketu and Sun are all important planets in these cases. Also as the serial killers were once victims of the torture or assault, Venus is either retrograde or inauspicious. 

Some killers mention that the homosexuality separated them from the society as they could not express their feelings. So when a person of same sexuality comes into their lives they become possessive and despicable to such a level that they kill the victim, cut their body parts and keep with them or keep the dead body near them for a long time. This makes them feel that the victim is near them in some or the other form, which can be the victim's body part too. In such cases Venus in the kundlis comes into play. A deadly combination of miserable Venus and Mars trigger the dark fantasies of homosexuals. Mental in-satisfaction can be the apparent reason but the roots of the issues lie in sexual (dark) fantasies which are not fulfilled in normal life where Venus plays a major role. Rahu and Ketu come into picture when the victim is not only abducted but tortured and killed. Rejection due to homosexuality in many cases cause loneliness or even ostracism.  I feel Saturn is the planet to be considered here. Inauspicious Saturn not only gives loneliness but also gives pessimistic thoughts / depression due to various circumstances. This also triggers the execution of the dark fantasies which are encouraged by depression. Such Saturn can cause weird crimes like cannibalism or keeping body parts of the victims. Again Ketu gives a ruthless psyche where human body is considered as a non living source of possession. These type of kundlis show different yogas between Saturn - Venus - Moon and Ketu. 

Some serial killers say that they are possessed by demons or evil powers. These powers 'order' them to kill others through dreams or voices (auditory hallucinations). This manifests the psychological disorders which are many times not diagnosed properly. These include schizophrenia, dual personality disorder, auditory hallucinations etc. The main ground is usually the assaults occurred in the childhood which emerge in the adulthood as psychological disorders. The obvious imbalance between the fantasy world and the real world causes these disorders. Then According to the intensity of assaults faced by the criminal they hallucinate different entities like Satan, demon or even God who 'order' them to kill. Such hallucinations worsen with time and addictions like drugs or alcohol. The addictions not only worsen the symptoms but also cause the disorders if not present earlier. Too much consumption of the prescription drugs especially without doctor's advice also adds to the whimsical behaviour and psychopathy symptoms. From astrological point of view inauspicious Moon and sixth house or sixth house lord cause these mental health issues. Some times if Mars is involved then the killing is not only a disorder or a purposely committed crime but unknowingly the criminals kill the victims. Mostly at the time of killing either they are under the effect of drugs or psychopathy drifts where the fantasy world overcomes the real world. In some cases some killers repent after they realize what they have done but their mental instability drives them towards their fantasy world again. The inauspicious Moon not only makes them emotionless but also kills their thinking power. This Moon forces them to stay in their fantasy world rather than real world. Rahu and Ketu may play a secondary role in this type of cases but definitely contribute in murders as mentioned earlier. Sometimes the killers become so sensitive that they get scared after viewing the gory scene created by themselves but again they take help of addictions to come out of the trauma. Such criminals also have inauspicious twelfth house in their kundlis which contributes to their habit of using drugs / alcohol as a remedy to calm their minds. 

I came across another strange point while studying the serial killers. Many of the serial killers have higher IQs. Famous 'Unabomber', Ted Kaczynski a PhD holder in mathematics, had his IQ even higher than Einstein. Edmind Kemper, Jeffrey Dahmer, Dennis Nilsen are some of the notable killers who had very high IQs. This shows that lack of intelligence is not the reason behind the serial murders. In fact intelligent but over sensitive minds of the killers are prone to psychological disorders which cause the crimes. Usually the intelligent killers are narcissistic too, this can also be proved by the example of Adolf Hitler. The best examples of narcissistic serial killers the Vienna strangler - Jack Unterweger and Ted Bundy. Extreme ego and pride disturbed their mental balance. Jack Unterweger was such a clever murderer that he managed to get released on parole, wrote his autobiography and at the same time kept on committing murders. Ted Bundy successfully broke out of prison a lot of times, he got married while in prison and also manipulated prison officers for illegal conjugal visits and fathered a baby girl. During trial he unsuccessfully advocated himself but was finally executed. When he came to know that his maternal grandfather is his biological father, he started hating females. In all this a girl whom he loved a lot rejected his marriage proposal and this narcissistic person transformed into a serial murderer and a necrophiliac. From astrological point of view his Moon and Sun were definitely bad but not inauspicious so he got cleverness and could even manipulate police. This proves that insanity can not be linked to these kind of criminals. Mercury plays an important role when people manipulate others. A properly placed Mercury in these criminals' kundlis furnishes them with the power of manipulation and talking skills. Sadly this natural gift is utilized in a wrong way. When seventh house and Mercury are connected in some way, it affects manhood and ego in an unsettling way. In such cases sexual assaults in childhood are not so common but abasement or abuse from an opposite gendered person is a vital factor. In cases of males an disgrace due to mother, sister, lover or wife bursts out as extreme obloquy. While talking about female criminals I can not stop myself mentioning about Aileen Wuornos (see photo). From her early childhood always smiling Aileen, was an easy prey for her own brother and her grandfather's friend.  Due to mere negligence from her parents she had to start prostitution at a tender age and started hating males. She was even betrayed by her homosexual partner whom she loved and trusted a lot, helped the police to catch Aileen after committing 7 murders. After years of sexual exploitation by males finally Aileen became a homosexual. Her story is definitely sad and painful but if we analyse her past and her mental instability it will shed light on her killing spree. In these cases such abuse is definitely not a one time incidence. Such psyche develops after years of abuse and assaults. 


A very common reason provided by serial murderers is that they had a significant injuries on their heads in childhood. Even doctors agree to the theory that such wounds can cause drastic changes in the psychology. I really doubt that these unspecified head injuries can be related to the murders committed in adulthood. I think in rare cases this can be the manifestation of the injuries but commonly linking this factors to killing spree is not acceptable. As many of the serial murderers who claimed that they had such injuries had a very good IQ and presence of mind.        
   
Many people ask me whether genetic disorders can be linked to the crimes like serial killing. In my opinion many times genetic disorders are highly unpredictable. We can trace the behavioural patterns like crimes by studying DNA. But this can not be the full proof evidence to prove that the accused is a criminal. I feel genetic disorders are not predictive to full extent otherwise every person with same genetic pattern will certainly become a serial murderer. And it will become very easy to stop such crimes on the basis of genetic analysis. I feel this can be one of the criteria of analyzing but it will depend on various other factors and can not be used in legal trials as a full proof against the accused. 

Not every body who faced assaults in childhood, had dysfunctional family, had head injury or genetic disorder becomes a serial murderer. Then why some people with similar background become criminals but not all? From astrological point of view, I feel that everybody gets affected by such circumstances in a different way. Everybody has different level of tolerance. Even we can observe the same pattern in our day to day life. Every person in our family reacts differently to the same situation. Similarly I feel criminal behaviour is rather a result of various experiences of life than a genetic disorder. When such sensitive people get addicted to drugs or alcohol, in the same way murders become their addiction. I feel one should not only focus on inauspicious Moon but should think about the yogas or reasons behind such Moon. When Saturn or Ketu are debilitated or badly placed then depression (Saturn) can lead to murder (Ketu). This combination compels them to behave with such a mindset that they consider victims a way to overcome their past. Such planetary combinations create criminals. Viz; When Ted Bundy was rejected by a girl whom he loved so badly that he killed more than 30 girls who looked similar to the girl who rejected him. A debilitated Moon in the fifth house with Ketu, seventh house lord Saturn in ascendant and 5 inauspicious planets in the fifth house in the kundli of Ted made him so sensitive and narcissistic that he started murdering after the rejection which became the triggering factor. Then again, this is an apparent reason as the real trauma was his hatred for his mother, incestuous relationship between his mother and grandfather and his disturbed childhood. This reason is of utmost importance as every man who gets rejected doesn't become a murderer. Though a good Venus in it's own sign was present in Ted's kundli it could not stop his murderous thoughts. 

Well, I have studied the kundlis of many serial murderers who came from different backgrounds. I never observed that a small reason created these monsters. Constant abuse for a significant period of time that too at a very crucial phase of life was the obvious reason for the crimes to occur. This depicts the importance of 'parenthood' in real terms. Of course the factors like cultures, ideologies do matter. I think practical remedies like being good parents or not to become parents if it is not possible should be taken into account seriously. Children should be taught to digest rejection either gently or harshly if needed. The reason I am putting this point is when the youngest serial killer 8 years old Amardeep Sada (India) was arrested his parents supported him and were in a denial position, which was harrowing. Giving birth to the progeny just under social pressure is also not a sign of good parenthood. I will be grateful if the readers can understand the importance of parenthood and think about having children if they can become good parents or at least having few number of children depending on their capacity. If crisis suddenly occurs it can be the result of Sanchit Karma and destiny. But by awareness and rational thinking we can definitely stop creating future criminals. I would like to mention that other than parenthood there are many factors responsible for crimes. Nevertheless I have focused on parenthood as this factor is of utmost importance and under our control.               

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
        ============================================== 

Wednesday, 15 January 2020

मधुराष्टक (Madhurashtak)




शुद्धाद्वैताचे जनक श्री वल्लभ आचार्य यांनी पुष्टिमार्गातून श्रीकृष्ण आराधना करण्यासाठी या रचनेची निर्मिती केली. या रचनेत श्रीकृष्णाच्या मधाळ वर्णनाबरोबरच भक्तिमार्गही दाखवला आहे. संपूर्ण मधुरसात आकंठ बुडालेली ही श्रीकृष्णस्तुती आठ कडव्यांमध्ये श्रीकृष्णाची गोड पण रोखठोक रूपं दाखवते. आश्चर्य म्हणजे श्रीकृष्णाच्या सहा आवडत्या बास-यांपैकी वेणू या बासरीचा उल्लेख आढळतो. खरे तर महानंदा ही राधेनं दिलेली बासरी त्याची सगळ्यात आवडती बासरी. पण वेणू या बासरीला कृष्णानं इतकं जवळचं मानलं कि राधाही तिचा द्वेष करीत असे. पौराणिक काळात संगीताराधनेत मूलभूत तीन खांब सांगितले आहेत. आत्मा-वीणा-वेणू. संगीताचे हे त्रिदेवच जणू. त्यात स्थान मिळवलेली ही वेणू नामक गोपिशत्रू नेहमीच श्रीकृष्णाच्या ओठाचे मधुरसपान करीत असे. या सर्वांगसुंदर दैवताचे वर्णन इतक्या रसभरीत रीतीनं करून वल्लभ आचार्य यांनी भक्तीसाठी एक प्रेमाचा मार्ग आखून दिलेला आढळतो. 

ब्रह्मसंहितेतही "वेणुम् क्वणन्तारविन्द दलायताक्षम्, बार्हावतंसम् असिताम्बुद सुन्दरााङ्गम्, कन्दर्प कोटि कमनीय विशेष शोभम्, गोविंदम् आदि पुरुषम् तं अहम् भजामि" (मी त्या परमदैवत गोविंदाचे पूजन करतो जो आपले वेणू वादनाचे कौशल्य दाखवतो, ज्याचे तजेलदार डोळे कमलदला सारखे आहेत, ज्याचे कपाळ निळ्या ढगांनी आच्छादल्याप्रमाणे मोरपिसाने सजलेले आहे आणि ज्याचे शरीर अनेक कामदेवांनाही लाजवेल इतके मोहक आहे त्याचे मी भजन करतो). अशा वर्णनाने श्रीकृष्ण नटला आहे. कामरस आणि काम शास्त्रातील अनेक पद्धतींचा जनक श्रीकृष्ण फक्त शरीरसुखातच अग्रेसर नव्हता, तर सर्व बाजुंनी स्त्रीला सुखावणारा होता. मोहकपणा बरोबरच न्यायप्रियता आणि शरीर सौष्ठव यात कुठेही कमी नसणारा हा नंदकुमार मानसिक रीत्याही गोपींचा प्रियकरच होता. कोणत्याही नात्यात तो परिपूर्ण असाच होता. खऱ्या अर्थाने 'वासुदेव' या पातळीला पोचलेला हा युगंधर होता. वासुदेव म्हणजे फक्त वसुदेवाचा पुत्र नव्हे तर श्री, पूर्णत्व, अचूकता, परिपूर्णता म्हणजे वासुदेव. मात्र या उपाधी साठी कृष्णानेही भौतिक तपश्चर्या केली होती. सहजासहजी हि उपाधी त्याला मिळालेली नाही. या लीलाधर श्रीकृष्णाचे पूजन आणि भजन दोन्ही साध्य करताना श्री वल्लभ आचार्य यांनी 'मधुर' या त्याच्या रूपाचा आधार घेतला आहे. कुणासही सहज राग न यावा असंच रूप असलेला हा श्यामल गवळी किती सहज सगळ्या गोष्टी साध्य करीत असे.

श्री कृष्णाच्या ह्या मधुर स्तुतीचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे: 

अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम् ।

हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझे ओठ मधुर आहेत, तुझे मुख मधुर आहे, तुझे डोळे मधुर आहेत, तुझं हास्य मधुर आहे, तुझं हृदय मधुर आहे, तुझं चालणंही मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

जेव्हा कृष्णानं बाम्बूच्या झाडाला विचारलं "मी सर्व गोपी, प्राणी पक्षांना मोहवतो मग तू मला काय देणार आहेस?" तेव्हा बाम्बू उत्तरला "हे देवा तुला हवे ते घे" कृष्णाने त्याचा जीव मागितला आणि त्याने तो दिलाही. त्याचे शरीर कापून कृष्णाने आठ छिद्रे केली जेव्हा बाम्बू खूप तळमळला. मग त्याची मधुर सूर उमटणारी बासरी करून कृष्णाने सतत ती आपल्या जवळ ठेवली. अगदी मृत्यू जरी आला तरी युगंधराच्या साध्या फुंकर घालण्यानंही ते दुःख सुरेल होतं याचंच हे प्रतीक, म्हणजे बासरी. 


वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरम् ।

चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझं बोलणं मधुर आहे, तुझं चरीत्र मधुर आहे, तुझे अलंकार मधुर आहेत, तुझं बाकदार शरीर मधुर आहे, तुझं चालणं मधुर आहे, तुझं गोंधळवून टाकणं मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

श्रीकृष्णाच्या बोलण्यातील एक नटखट आणि राजकारणी गुण म्हणजे दुसऱ्याला गोंधळात टाकणे. स्वतःच अवतारी पुरुष असल्याने सर्वज्ञानी असलेला हा नारायण स्त्रियांना गोंधळात टाकून ते सौन्दर्य टिपत असे आणि पुरुषांना गोंधळात टाकून राजकारण खेळत असे. असा हा कावेबाजपणा कधी मादक तर कधी घातक ठरे. रंगिणी, नवमाळी, सुमाली, चमेली, जाई इत्यादी फुलांनी सजलेला मुकुट, वैजयंती नामक रानफुलांची माला (जी राधेनं त्याला स्त्रीरूप दाखवताना पहिल्या प्रणयाराधनाआधी दिली होती), बलापास्य नामक गजरा, ताडांक नामक भिकबाळी, कमल, भृंग आणि डाळिंबाच्या फुलांनी सजलेल्या कर्णिका, पुष्पी नावाचे डूल, ग्रेवेक्यक नामक छोटी फुलांची माला, अंगद नामक वाकी, मणिबंधीनी नावाचं कंकण, सिंधूवर फुलांनी सजलेला माथा, शिवाय हंसक, कंचुली इत्यादी अलंकारांनी नटलेला हा कामदेव रुपी नर खरोखर अपूर्व सुंदर होता. 

वेणुर्मधुरो रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरौ ।
नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझी वेणू मधुर आहे, तुझ्या शरीरावरील परागयुक्त फुले मधुर आहेत, तुझे नटलेले हात मधुर आहेत, तुझे पाय मधुर आहेत, तुझं नृत्य मधुर आहे, तुझं सख्य मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

वाजवायला कठीण असलेली मदनझंकृती नामक बासरी ही खरे तर या बन्सीधराची ओळख. याच बासरीने प्राणिमात्रांनाही मोहविले. पण 'वेणू'तून निघालेले सूर काही आगळेच. त्यात नुसती मधुरता नाही तर मादकपणा होता. अगदी लीलया आलेला हा सौन्दर्याविष्कार रासलीला रचवून जायचा. खरे तर त्याच्या अंगावर सांडलेल्या परागकणांची तुलना स्त्री स्तनाग्रांभोवती असलेल्या उठावदार पण नाजूक लालसर माळेशी केली गेली आहे. त्या बिंदूंची आठवण करून देणारे ते परागकण कोणत्याही स्त्रीला प्रणयच नव्हे तर बाळाच्या लुचण्याचीही आठवण देत असत. एक प्रेयसी आणि अनंतकाळची माता या दोन्हीही पर्वातील मधुर क्षणांचंच ते प्रतीक. पण कृष्णानं सगळ्या गोपीना जणू अनंतकाळची प्रेयसी म्हणूनच थोपवून धरलं होतं जणू . नखशिखांत मादकतेने भरलेला हा लीलाधर एक सखा म्हणूनही परीपूर्ण असाच होता. द्रौपदी पासून सुदामा पर्यंत साऱ्यांनी हे सुख पुरेपूर अनुभवलं. पण मधुवासी ब्रिजबलांना मिळालेला सखा काही औरच होता.

गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं ।
रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझं गाणं मधुर आहे, तुझं पिणं मधुर आहे, तुझं खाणं मधुर आहे, तुझं झोपणं मधुर आहे, तुझं रूप मधुर आहे, तुझा टिळा मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.
 
विश्वरूप दर्शन देणारा हा असामान्य योद्धा खऱ्या नावाप्रमाणेच आकर्षण होता. देवकी मातेचं सारं सौन्दर्य आणि वसुदेवांचं राजसौष्ठव एकवटलेला हा देवकी पुत्र अत्यंत देखणा आणि श्यामरंगी होता. द्रविडी सौन्दर्याची खूण असलेला श्याम रंग खरे तर आपण कृष्ण म्हणून चुकीच्या पद्धतीने घेतो. कृष्ण या शब्दाचा खरा अर्थ आहे कृषी + ण शेतीचा देव. ज्या अन्नावर आपण जगतो त्या अन्नाचा पालक आणि पर्यायानं पालक विष्णू. खरे तर विष्णू म्हणजे विश्यति प्रविष्यति इति विष्णू = जो हवे तिथे प्रवेश करू शकतो असा तो विष्णू. अन्नकणांतही प्रवेश करून जीवन देणारा असा तो कृष्ण. पण कृष्ण म्हणजे काळा हे चुकीचं समीकरण ह्या दैवताच्या रंगामुळे झाले आहे. माधुर्य काळ्या रंगातही असतं असं गोऱ्या रंगाच्या आधीन गेलेल्या आर्यवंशी जनमानसाला हा एक धडा असावा. रंगावर प्रेम करून जात, वय, कौमार्य यावर प्रेम वा विवाह ठरवणाऱ्या तमाम समाजाला कृष्णानं एक आदर्श घालून दिला आहे. विवाहित राधा आणि गांधर्व पद्धतीनं विवाह झालेली वैदर्भीय राजकन्या रुक्मिणी ह्या दोन उदाहरणातून कृष्णाचं स्वच्छंदी प्रेमच दिसून येतं. 

करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरम् ।

वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझी कृत्य मधुर आहेत, तुझं तारणं मधुर आहे, तुझं हरण करणं मधुर आहे, तुझं प्रणयमिलन मधुर आहे, तुझं भावना दर्शविणं मधुर आहे, तुझं शांत होणं मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस. 

वैदर्भीय राजकन्या रुक्मिणी हिचं केलेलं हरण कोण विसरेल? त्या सुरेख प्रसंगात प्रेमी जीवांना दिलेला एकरूप होण्याचा अधिकार आणि पुरुषाचं पौरुषत्व याचं दर्शन होतं. 'पु' या बीजाचा अर्थच अनंत काळ टिकणारा असा आहे. पुरुष हा पौरुषाचं म्हणजेच अनंतकाळच्या पालकत्वाचं प्रतीक आहे. या ताकदीचं दर्शन घडवून देणारा हा वासुदेव परीपूर्ण पुरुष आहे. स्त्रीच्या भावना जपणारा आणि तिला आंतरिक समाधान देणारा असा हा पुरुष आहे. भावना दर्शविताना कुठेही न संकोचणारा धीट असा हा पुरुष प्रियकर रुक्मिणीचं हरण करताना रुक्मि ला घायाळही करतो. कुठेही पौरुषत्व न लपवता रक्तपातही करणारा, कालिया मर्दन करणारा, कंसवध करणारा हा योद्धा महाभारताच्या युद्धावेळी एक सारथी होतो. ही सगळीच मधुर रूपं मोहक आहेत. रतिक्रीडेवेळी उत्कट होणारा हा मिलिंद त्यानंतरही घायाळ करणारं मादक हास्य करतो आणि मन आणि शरीर शांत करतो. ह्या अनेक रुपातला भाव मधुर असाच आहे. 

गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा ।

सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझा प्रणयाराधनेच्या वेळचा गुंजारव मधुर आहे, तुझी वैजयंती माला मधुर आहे, तू ज्या नदीकाठी बसतोस ती यमुना मधुर आहे, त्या यमुनेच्या लाटा मधुर आहेत, त्या यमुनेचं पाणी मधुर आहे, तुझं अलंकारातलं कमळ मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

श्रीकृष्णाचा प्रणय काळातील गुंजारव बासरी सारखा मधुर असे. त्या वैजयंती फुलांची माळही त्या वेळी सुंदर दिसे. या रानटी फुलांची औषधी शक्ती अशी आहे कि ती फुले हळदी प्रमाणे जिवाणू मारू शकतात. ही फुले स्वतःच नैसर्गिकरीत्या लवकर खराब होत नाहीत. त्यातील औषधी गुणांमुळे ती रोगापासून स्वतःला दूर ठेवतात तसेच त्यापासून दारुही बनवली जाते. अशा ह्या औषधी आणि वारुणीसुगंध युक्त फुलांचा प्रभाव प्रणयकालात न पडला तरच नवल. रोगमुक्त शरीर आणि वारुणीचा आभास असे दोन्ही गुण प्रणयकालात उपयुक्त असेच होते. यमुनेप्रमाणे अथांग प्रेम, आणि प्रणय काळातील शरीराची लाटांसारखी हालचाल, शरीरावर जमलेले घर्मबिंदू जणू यमुनेच्या जलाप्रमाणेच पवित्र प्रेमाचे प्रतीक आणि नाजूक पण उठावदार शरीर अवयवांचं प्रतीक असलेलं कमळ. मूर्तिमंत प्रेमाचं प्रतीक असलेला हा बन्सीधर मधुर असाच आहे. 

गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरम् ।

दृष्टं मधुरं शिष्टं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझ्या गोपी मधुर आहेत, तुझ्या लीला मधुर आहेत, तुझं एकरूप होणं मधुर आहे, तुझं मुक्त करणं मधुर आहे, तुझं रोखून बघणं मधुर आहे, तुझं शिष्टाचारानं वागणं मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

जवळपास सर्व गोपी ह्या विवाहित होत्या. पण त्यांचा सखा मात्र कृष्णच होता. उत्कटतेनं एकरूप होऊन तेव्हढ्याच कोमलतेनं स्त्रीला दूर करणं ही कला ह्या नटवाराला छान जमली. इतक्या स्त्रियांशी शारीरिक जवळीक करूनही कुठेही शिष्टाचार न सोडणारा हा सभ्य प्रियकर स्त्रियांचा अत्यंत लाडका होता. स्त्रीचं शरीर हा तिचा खरा अहंकार असतो. स्वतःहून शरीर समर्पण करताना स्त्री फुलते पण बळजबरीनं ती कोमेजते. म्हणूनच कायम बहरलेली वैजयंती माला ह्या स्त्री मनाचंच एक प्रतीक आहे. कोणत्याही गोपीचं मन न दुखावता आकर्षून घेणारा हा कामरूपी मुकुंद स्त्रीला फुलासारखं जपायचा. आजही अशा प्रियकरांचं वर्णन कृष्ण म्हणूनच केलं जातं. प्रत्येक गोष्टीत सौन्दर्य आणि शिष्टाचार यांचा समतोल साधणारा हा मनुष्यरूपी कामदेव कोणत्याही स्त्रीला आदर्शच वाटेल. खरे तर श्रीविष्णू यांचं शेषशायी हे रूपही असंच. लक्ष्मीला प्रणय हवा असताना कुणी पाहू नये यासाठी स्त्री सुलभ लज्जेनं केलेली एकांताची मागणी शेषनागरूपी पडद्यानं विष्णूंनी पूर्ण केली. स्त्रीभावना जपण्याचं हे आणखी एक उदाहरण. अगदी निरागस भाव असणाऱ्या गायींनाही आकर्षून घेण्याची क्षमता असणारा हा संगीत प्रभू स्त्री संगात कसा कमी ठरेल?

गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा ।

दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् ॥

हे श्रीकृष्णा तुझे गोप मधुर आहेत, तुझ्या गायी मधुर आहेत, तुझा गोप परीवार मधुर आहे, तुझी निर्मिती मधुर आहे, तुझं पायदळी तुडवणं मधुर आहे, तुझ्या भक्तीचं फलित मधुर आहे. हे मधुराधिपते तू सर्वांगानेच मधुर आहेस.

गोविंद म्हणजेच गो = सृष्टी विंद = आनंद देणारा साऱ्या सृष्टीला आनंद देणारा असा हा गोविंद. खरे तर गोविंद याचं खरं रूप गोमांस आहे. चुकीच्या रीतीनं गायीचं मांस असा अर्थ निघतो. पण गोमांस (गो = सृष्टी माम् = मला स = परम ईश्वर) म्हणजे  जो चराचरात आहे आणि मला परम ईश्वराकडे घेऊन जातो तो गोमांस. सर्व वर्ण वरोत्तम 'ह' ने सुरु होणारे 'हरी' हेही याच रूपाचं नाव. र म्हणजे शरीरातील ईश्वरी शक्ती. ई कार म्हणजे श्वास घेण्याची शक्ती. 'हरती अविद्यम् इति हरी' जेव्हा जीवशक्ती नष्ट होते तेव्हा आत्म्याचं रूप 'हरी' होतं, ईश्वराशी एकरूप होतं. ज्याच्या हातून मृत्यू आल्यास मुक्ती मिळते असा तो. गाय हे अशा निःस्वार्थी प्रेमाचं निरागस प्रतीक. त्या गायीला आणि तिला सांभाळणाऱ्या गोपांना पालक म्हणून सांभाळणारा हा हरी. लाहिरी महाशय यांच्या नुसार कृष = वाढवणे न = नकार जे शेतीची गोपालनाची कामे करतात ते गोप त्यांना पाळणारा (कृष) तो गोपांच्या कर्माला नकार देऊन त्यांच्यातल्या ईश्वरी प्राण शक्तीचे अस्तित्व दाखवतो तो कृष्ण. सर्वच चराचर सृष्टीचं असं पालन करणारा हा कृष्ण मधुरच आहे. अध्यात्मात अनेक रीतीने पुजला गेलेला विष्णू भौतिक जगात कृष्ण म्हणूनच लोकप्रिय आहे. अशा ह्या लोकप्रिय दैवताची ही भक्ती पुष्टिमार्गाने केल्यास अद्वैतवाद साधता येईल या मताने श्री वल्लभ आचार्य यांनी या रचनेला आकार दिला. प्रेम आणि अध्यात्म यांचा हा मिलाफ पुन्हा पुन्हा वाचावा असाच आहे. शिवाय माझं नाव मधुरा या श्रीकृष्ण स्तुती मध्ये इतक्यावेळा यावं यापेक्षा मोठं भाग्य ते काय असेल ? 

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
   =============================================

The Author of Shudhadvaita Shri Vallabh Acharya created this composition to worship Lord Shri Krishna, by Pushtimarga. Along with this the composition describes Shri Krishna with sweetness along with Bhaktimarga - The path to God is through love. This apprehension of Shri Krishna is completely woven in Madhu rasa (sweet emotions), which not only limns his sweetness but also his equivocal forms. Surprisingly it mentions the 'Venu' bansuri (flute) which was the most favourite of Shri Krishna amongst his six favourite bansuris. The bansuri 'Mahananda' which was gifted to Shri Krishna by Radha was best-loved by him. But, the bansuri 'Venu' was so dear to him, that even Radha had started being jealous of it. In ancient times Indian culture considered 3 basic pillars of Worship by Music. Atma - Veena - Venu, almost considered as Trinity of music. One of the Trinity and enemy of the Gopis, 'Venu' was lucky to drink the nectar of Shri Krishna's lips. Shri Vallabh Acharya described this Lord of sweetness so charmingly that it shows the path of pure love to the disciples for Bhaktimarga.  

Bramhasamhita also describes Shri Krishna in a very ornamental way saying " I worship the Supreme Lord Govind who evinces his skill of playing Venu, whose eyes are like Lotus petal, whose forehead is covered with peacock feather and looks like muffled up in blue clouds and whose body is more beautiful than Kamadeva". Shri Krishna, the creator of many variations of Kamashastra and Kamarasa, was not only a prodigy in sex but he was a real man who was able to satisfy a woman in true sense. This son of Nanda was not only attractive but was also righteous and powerful. Emotionally every Gopi was in love with him. He was a plenipotentiary master in any relationship. This almighty Lord (Yugandhar) truly attained the position of 'Vasudeva'. 'Vasudeva' is not merely the son of Vasudev but Shri, completeness, perfection, being ideal is 'Vasudeva'. Well, Lord Krishna himself has put his efforts to attain this position. He didn't get this title easily. To worship and praise this Leeladhar, Shri Vallabh Acharya chose the Madhur or sweet form (rupa) of Shri Krishna. A very sweet and dewy eyed but dark skinned milkman (Gawli) did impossible things in his life so smoothly. 

I am trying to comprehend this (sweet) praising of Shri Krishna:

adharaṃ madhuraṃ vadanaṃ madhuraṃ
nayanaṃ madhuraṃ hasitaṃ madhuram। 
hṛdayaṃ madhuraṃ gamanaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥ 

 O Krishna, your lips are sweet, your cherubic face is sweet, your mesmerizing eyes are sweet and your laughter is sweet। Your loving heart is sweet and your enchanting gait is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness ॥
  
When Shri Krishna asked the bamboo tree " I entice the Gopis, other animals and birds, so what are you going to offer me?" The bamboo answered "Take whatever you want". Shri Krishna asked for his life and he did not hesitate. Krishna cut his body, made eight holes to it and the bamboo was agonized. After this examination Krishna made a beautiful flute out of the body of the bamboo tree, called Bansuri emanating hypnotizing tunes and he kept the flute always with him. Even if the death is near the sorrow becomes sweet due to mere whiff of Shri Krishna is the symbolic form of the Bansuri.  

vachanaṃ madhuraṃ charitaṃ madhuraṃ
vasanaṃ madhuraṃ valitaṃ madhuraṃ। 
chalitaṃ madhuraṃ bhramitaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥      

O Krishna, your speech is sweet, your nature is sweet, your garments are sweet and your bent posture is sweet। Your movement is sweet and your creation of confusion is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥    

To bemuse anyone was a naughty but in a sense political efficacy of Lord Krishna. Being the incarnation of Lord Vishnu himself, the omniscient Narayana used to confuse the women around him to observe that innocent beauty and confuse the men for political purpose. This guile sometimes was intoxicating but sometimes proved to be ruinous. With the crown decorated with beautiful flowers like rangini, navamali, sumaali, chameli and jaai, gorgeous Vaijayanti Mala made from different wildflowers (offered to him by Radha during the courtship), balapaasya flower ornament, a upper earring called tadaank, earrings made from lotus, bhrunga and pomegranate, small earrings made of pushpi, small flower garland called grevekyak, upper hand ornament angada, manibandhini bracelet, forehead adorned with sindhuvar flowers and other ornaments like hansaka and kanchuli this manly beauty like Kamadeva was absolutely ecstatic and irresistible.  

veṇu-rmadhuro reṇu-rmadhuraḥ
pāṇi-rmadhuraḥ pādau madhurau। 
nṛtyaṃ madhuraṃ sakhyaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥

O Krishna, your flute 'Venu' is sweet, your flowers (with pollen) are sweet, your hands are sweet and the dust of your feet is sweet। Your dance is sweet and your friendship is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥   

'Madanajhankruti' a bansuri very difficult to play is in fact the real identity of Bansidhara - Shri Krishna. This bansuri hypnotized the animals too. But the tunes emerging from Venu bansuri were out of this world. The were not only sweet but were intoxicating. This deftly and graceful piece of art gave rhythm to Rasleela. In the poetrical sense the pollen grains scattered on Krishna's body were equated to the salient but dainty red garland around the nipples of a woman. These pollen grains not only jogged the memories of women about romance but also the feeding of the baby. It was a symbol of the golden moments in women's life both as a lover and as a mother. A woman is said to be in undying motherhood once she conceives a baby, but Shri Krishna stymied them to be undying lovers. A cap-a-pie cupid - Leeladhara was a faultless 'sakha' or lover of the Gopis. His divine friendship was deeply experienced by everyone from Draupadi to Sudama. But, being the 'sakha' of the Gopis of Brijabhumi was a totally angelic role played by Shri Krishna.     

gītaṃ madhuraṃ pītaṃ madhuraṃ
bhuktaṃ madhuraṃ suptaṃ madhuraṃ। 
rūpaṃ madhuraṃ tilakaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥ 

O Krishna, your singing is sweet, your drinking is sweet, your eating is sweet and your sleeping is sweet। Your form is sweet and your mark (tilak) on the forehead is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥

This extraordinary warrior revealing his cosmic form was truly attractive as his real name Akarshan means. Inheriting his mother Devaki's beauty and his farther Vasudeva's handsomeness Shri Krishna was very princely looking with a dark complexion. A mark of the Dravidian beauty i.e. dark skin is absolutely misinterpreted by us as krishna (colour). In practicality krishna means krushi +N (the God of farming) The God of food on which we survive, the operator, none other than Lord Vishnu. Vishnu literally means 'vishyati pravishyati iti' (one who can enter anywhere). By entering in food particles he offers us life.But, Krishna is dark coloured is a very wrong interpretation, which was linked to the skin colour of this incarnation of Lord Vishnu. Perhaps this was a lesson to the white supremacist people and let them realize that beauty lies in any colour. Shri Krishna has indirectly taught a lesson to such people whose criteria for love depends on skin colour, age, race / caste. Krishna's pure lovemaking with already married Radha and eloping with princess of Vidarbha, Rukmini shows his boundary-less love. 
        
karaṇaṃ madhuraṃ taraṇaṃ madhuraṃ
haraṇaṃ madhuraṃ smaraṇaṃ madhuraṃ। 
vamitaṃ madhuraṃ śamitaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥   

O Krishna, your acts are sweet, your carrying over is sweet, your stealing is sweet and your divine love play is sweet।Your exuberance is sweet and your relaxation is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥
  
Who can forget the eloping of Shri Krishna with the princess of Vidarbha, Rukmini? The episode depicts the right of the lovers to come together and manhood of the real 'man' (Purusha). The root or beej 'pu' itself means infinitely existing. A purusha is a symbol of manhood or infinite guardian (of a female). 'Vasudeva' the form of Shri Krishna depicts this power of a complete man. This form satisfies a woman in every sense and pampers her emotions. This brave and bold lover who never hesitates to express his emotions also hurt Rukmi, the brother of Rukmini without any prejudice. With no hesitation to express his courage this brave lover never fears for bloodshed, goes on to kill the Kaliya Naga, kills his maternal uncle Kansa and becomes a charioteer in the war of Mahabharata. All these forms of his are alluring. At the time of lovemaking this Milinda becomes passionate, gives an intoxicant smile and is able to satisfy a woman's body and mind. All these forms of Shri Krishna are sweet, absolutely sweet...

guñjā madhurā mālā madhurā
yamunā madhurā vīchī madhurā।   
salilaṃ madhuraṃ kamalaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥

O Krishna, your humming is sweet, your garland is sweet, the Yamuna river is sweet and her rippling waves are sweet। The water (of Yamuna) is sweet and the lotus flowers floating in the river are sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥ 

The humming of Krishna while lovemaking was sweet as a flute. The garland of Vaijayanti mala looked very elegant at that time. The flowers used in the Vaijayanti mala are medicinal like turmeric and can kill infectious bacteria. These flowers don't get spoiled easily. Due to the medicinal properties not only these flowers remain fresh but some good quality liquor is prepared using these flowers. No wonder these medicinal but intoxicating flowers affect the mood while lovemaking. A healthy body and intoxicating smell of these flowers both were effective during lovemaking. Unfathomable love like the deep Yamuna river, wavy movements of the body during lovemaking, the sweat droplets impersonating pure water of Yamuna and lotus flowers mimicking the curves of the body.. Bansidhara, the absolute symbol of love is very sweet.

gopī madhurā līlā madhurā
yuktaṃ madhuraṃ muktaṃ madhuraṃ। 
dṛśhṭaṃ madhuraṃ śiśhṭaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥ 

O Krishna, your Gopis (cowherd girls) are sweet, your divine play is sweet, your togetherness is sweet and your setting free is sweet। Your glance is sweet and your courtesy is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥ 

Almost all the Gopis in Brijabhumi were married, though their true love was Shri Krishna. This Natavar was the master of passionate love and a delicate separation. While close to so many women, he never forgot his etiquette and this was the reason this Natavar was so popular among them. A woman's body is her real pride. A woman blossoms if she willingly participates in lovemaking but she withers under force. So the never withering freshness of the Vaijayanti mala was the symbol of a woman's mind when Krishna was around. This cupid like Mukund would attract every Gopi without hurting her mind. Even today such lovers are called 'Krishna'. Like a  Kamadeva in human incarnation Krishna would be the ideal lover for any woman, who maintained a perfect balance between beauty and courtesy. Sheshashayi Bhagwan (reclining on the serpent-bed of Shesha) - the form of Lord Vishnu also depicts the same balance. When Shri Laxmi urged for lovemaking she demanded privacy to avoid embarrassment. Shri Vishnu fulfilled her wish by using Shesha Naga as a veil. This is another example of taking care of a woman's dainty emotions. How this perfect lover and the master of music, who attracted the innocent cows too, would fail to satisfy the desires of women?

gopā madhurā gāvo madhurā
yaśhṭi rmadhurā sṛśhṭi rmadhurā।   
dalitaṃ madhuraṃ phalitaṃ madhuraṃ
madhurādhipaterakhilaṃ madhuram॥ 

O Krishna, your Gopas (cowherd boys) are sweet, your cows are sweet, your herding staff is sweet and your creation is sweet। Your breaking is sweet and your making is sweet; everything about you is sweet, O Lord of Sweetness॥ 

Govind is derived as go (nature) +vinda (happiness) i.e. the one which gives happiness to the world. Metaphorically real form of Govinda is Gomansa. Though it is mostly misinterpreted as beef. But, Gomansa is go (nature) + mam (to me) + sa (almighty Lord) which means the one who drives me to the almighty Lord and exists in every particle of nature. 'Hari' is another form of this name which includes the most exalted Varna 'ha'. 'ra' is the divine power in the body and 'i' is the power to breath. It is derived from 'harati avidyam iti Hari' which means when the mortal power of Jeeva perishes then the soul becomes 'Hari' and unites with the almighty Lord. So 'Hari' is a form of the Lord which will bless you with salvation if you die at his hands. Cow is a very innocent form of such selfless love. The guardian of the cows and the cow herds is Hari. According to Lahiri Mahashay Krishna is derived from Krish (nurture) + na (No) which means the one who denies the (negative) results of Karmas of the cowherds and shows his powerful existence to save them is Krishna. Krishna, the powerful guardian of the nature is really sweet. Though in spiritual world, Lord Vishnu is worshiped in various ways, but in mundane life his incarnation of Krishna is the most popular one. Shri Vallabh Acharya created this beautiful Madhurashtaka claiming that if this popular deity is worshiped through Pushtimarga then it will help to attain Advaitvada, spiritual realization. We are no doubt tempted to read this conciliation of love and spirituality again and again. 

Well, my name Madhura has been mentioned in every line of this beautiful creation praising Lord Krishna. What will be more prosperous than this?

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
       ==========================================

Sunday, 5 January 2020

अंतराळातील अंत (In - space fatalities) 


मृत्यू हे आपल्या सर्वांच्याच आयुष्यातलं अंतिम सत्य असतं. मृत्यूची विविध कारणं आणि जागा असू शकतात जे कोणाच्याही हाती नाही. आपल्याला माहित असलेले मृत्यू हे ठराविक कारणांनी आणि पृथ्वीवरच काही जागी, पाण्याच्या खाली असे झालेले असतात. पण आज एका वेगळ्या जागी होणाऱ्या मृत्युंबद्दल अभ्यास करून काही लिखाण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. 

अंतराळवीर संशोधनासाठी अंतराळात जातात तेव्हा ते धाडसीपणानं मृत्यूची चादर ओढूनच सर्व संकटांची कल्पना असतानाही प्रवास करत असतात. माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत अशा केवळ १८ अंतराळवीरांचा मृत्यू अवकाशात झाला आहे. त्याबद्दल ज्योतिष शास्त्रात पुरेशी माहिती उपलब्ध नाही. पण ज्योतिष शास्त्रानुसार असे कोणते योग कुंडलीत असावेत ज्यामुळे मृत्यू अवकाशात होतो? ह्याबद्दलचे माझे विचार मी इथे मांडत आहे.  

काही अंतराळवीरांच्या कुंडल्या आणि त्यांचा अवकाशात जेव्हा मृत्यू झाला तेव्हाची ग्रहस्थिती अभ्यासल्यानंतर मला ज्योतिष शास्त्रानुसार जे मुद्दे लिहावेसे वाटले ते मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 

अवकाशातील मृत्यू हा थोडा वेगळा वाटला तरीही तो अपघाती मृत्यू याच सदरात येतो. कारण अवकाशयानामधील विविध तांत्रिक बिघाडांमुळे असे मृत्यू ओढवतात. आता हे बिघाड कोणते आणि याचे कोणते परीणाम झाले याचा आढावा घेऊ. 

१) २४ एप्रिल १९६७ रोजी व्लादिमिर कोमारोव्ह हे रशियाचे अंतराळवीर सोयझ १ या अवकाशयानातून जात असताना पृथ्वीच्या वातावरणात आल्यावर अवकाशयानाचं पॅराशूट वेळीच न उघडल्यामुळे त्यांचं यान अत्यंत तीव्र गतीनं पृथ्वीवर आदळलं. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.       
                                        कोमारोव्ह यांचे अवशेष

२) ३० जून १९७१ रोजी सोयझ ११ मधील ३ अंतराळवीर जॉर्जी डेब्रोव्हस्की, व्हिक्टर पॅत्साएव्ह, व्लादिस्लाव्ह वोल्कोव्ह हे मृत अवस्थेत सापडले. प्रथमदर्शनी कोणताही जीवघेणा अपघात निदर्शनास आला नसला तरी संशोधनानंतर त्या अपघाताचं कारण समजलं. वायुविजनासाठी असलेली झडप व्यवस्थित काम करत नसल्यानं पृथ्वीच्या कक्षात आल्यानंतर त्या तिघांचा गुदमरण्यामुळे (प्राणवायू कमी पडल्यानं) मृत्यू झाला. त्यांच्या शरीरावर निळे डाग आणि कानातून व नाकातून रक्त आल्याचं दिसत होतं. जॉर्जी डेब्रोव्हस्की यांचं शरीर सापडलं तेव्हा थंड पडलेलं नव्हतं, म्हणजे हे मृत्यू पृथ्वीवर यायच्या आधी थोडा काळच झाले असावेत. 

३) २८ जानेवारी १९८६ रोजी चॅलेंजर या अंतराळयानाचा उड्डाणानंतर ७३ सेकंदांनीच अवघ्या ४९००० फुटांवर (१५ कि. मी.) स्फोट झाला. त्यातील ग्रेगरी जर्व्हिस, क्रिस्टा मॅकॉलिफ, रॉनल्ड मॅकनायर, एलिसन ओनीझुका, ज्युडिथ रेसनिक, मायकल स्मिथ आणि डिक स्कोबी या सर्व ७ वीरांचा मृत्यू झाला. त्यातील बरेचसे अंतराळवीर हे प्राणवायू न मिळाल्यामुळे गुदमरून मरण पावले असावेत अशी शंका आहे. काहींनी प्राणवायूसाठी असलेली आपात्कालीन व्यवस्था वापरण्याचा प्रयत्न केलाही. पण त्यांच्या यानाचा पृथ्वीवर आपटण्याचा वेग इतका प्रचंड होता (३२० किमी / तास) की त्या धक्क्यानंच ते मरण पावले. हे यान समुद्रात आदळलं, त्यामुळे सर्व लोकांचे अवशेष मात्र हस्तगत करता आले नाहीत.

४) १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया या अंतराळयानातून परत येत असताना त्यातील कल्पना चावला, रिक हसबंड, विल्यम मकूल, मायकल अँडरसन, डेविड ब्राउन, लॉरेल क्लार्क आणि इयान रॅमॉन या सर्व ७ अंतराळवीरांचा मृत्यू झाला. पृथ्वीच्या कक्षात आल्यावर या यानाच्या अग्निच्या नियंत्रणात बिघाड झाल्यानं तापमान प्रमाणाबाहेर वाढून यान फुटलं आणि त्याचे तुकडे विखुरले गेले. यात या वीरांचा जळून मृत्यू झाला. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या यानातील बिघाड यानाच्या उड्डाणाच्या वेळीच लक्षात आला होता पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. 

                                               कल्पना चावला

(वरील माहिती इतक्या सखोलपणे देण्याचं कारण इतकंच की सर्व अंतराळवीरांची नावं वाचकांना कळावीत. भारतीय वंशाच्या कल्पना चावला सोडल्या तर इतर अंतराळवीरांची नावं आपल्याला ठाऊक नाहीत. म्हणूनच त्यांना एक प्रकारची मानवंदना देण्यासाठी मी आदरयुक्त भावनेनं सर्व अंतराळवीरांची नावं आणि त्यांच्या मृत्यूच्या तारखा दिल्या आहेत.)                                       

वरील सर्व माहितीचा ज्योतिष शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता यानाच्या उड्डाणाची वेळ अतिशय महत्त्वाची आहे. पृथ्वीवरील प्रवासासाठी आपण जे निकष लावतो त्याचा इथे फारसा उपयोग होणार नाही. पण यानाच्या उड्डाणाच्या वेळची कुंडली पाहिली तर त्यातील द्रेष्काण कुंडली अति महत्त्वाची ठरेल. प्रत्येक राशीचे ३ असे ३६ द्रेष्काण आणि त्यांची ३६ रूपं आहेत. कोणत्याही प्रवासाच्या वेळी शुभ द्रेष्काण उदित असेल तर प्रवास सुखरूप होऊन विजय मिळतो. पण अशुभ द्रेष्काणात मृत्यू किंवा इतर वाईट फळं मिळू शकतात. वरील नमूद केलेल्या चारही अंतराळ यानांच्या उड्डाणाच्या वेळा लक्षात घेता द्रेष्काण कुंडली मांडल्यावर काही मुद्दे लक्षात आले. प्रत्येक यानाच्या उड्डाणाच्या वेळी द्रेष्काण कुंडलीत अष्टम स्थान, अष्टमेश किंवा चंद्र बिघडलेले होते. सोयझ १, चॅलेंजर या दोन्ही यानांच्या उड्डाणाच्या वेळी अशुभ द्रेष्काण उदित होतंच. पण अष्टम स्थानाशी असलेला शनिचा संबंध घातक ठरला. सोयझ ११ च्या उड्डाणाच्या वेळी द्रेष्काण कुंडलीत अष्टमातील बुध आणि शनि, व्ययस्थानातील मंगळ आणि राहू अत्यंत घातक ठरले. कोलंबिया यानाच्या उड्डाणाच्या वेळीही कोणतेही शुभ योग द्रेष्काण कुंडलीत नसून चंद्र अत्यंत अशुभ होता. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना जे योग असतील तेच योग कार्य पूर्ण करण्यास मदत करतात, कारण त्यांची वाईट फळं एकदा प्रवास सुरु झाला की टाळता येत नाहीत. 

अंतराळ प्रवासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या यानाने प्रवास करायचा आहे त्या यानाची बनावट कोणत्या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते ते पाहणं. गुरू शुक्र हे दोनही ग्रह विमान, अंतराळयान यांच्या बनावटीच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. मंगळ आणि शनि हे यंत्राचे कारक ग्रह आणि शारीरिक दृष्टीनं विचार करता रक्त, हाडं यांचे कारक ग्रह आहेत. वरील यानांचे अपघात पाहता यान पृथ्वीवर तीव्र वेगाने आदळल्यामुळे काही मृत्यू झालेले आहेत. तर काही मृत्यू रक्तातील प्राणवायू कमी झाल्यानं गुदमरून झालेले आहेत. मंगळ व शनिची तीव्र वाईट फळं इथे पाहायला मिळतात. अशुद्ध रक्तप्रवाह आणि त्यामुळे हृदयावर होणार परीणाम हा खूप घातक ठरला आहे. तरीही जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येनं अंतराळवीर प्रवास करत असतील तर नक्की किती जणांचा मृत्यू होईल हे सांगणंही शक्य वाटत नाही. संपूर्ण यानाचा विध्वंस झाला तर सर्वच व्यक्तींचा मृत्यू होईल, त्यामुळे गुरू, शनि आणि शुक्र या प्रमुख ग्रहांचा कुयोग असेल तर यानाचा अपघात हे भाकीत करता येईल.        

अंतराळवीरांच्या कुंडलीतील नवम स्थान खूप महत्त्वाचं स्थान असतं. कारण ह्या स्थानाशी निगडित मृत्यू हा दूरवर झालेला असतो. आता ह्या सर्वांचा मृत्यू दूरवर म्हणजे अगदी काही वेळा पृथ्वीच्या कक्षेबाहेरही झालेला आढळतो. याचं कारण म्हणजे यांच्या कुंडलीतील नवमस्थानाचा अष्टमेशाशी कुयोग. असा योग असल्यानं अगदी सर्वांचा प्रत्यक्ष मृत्यू अवकाशात झाला नसला तरी त्याचं मूळ कारण म्हणजे यानातील बिघाडाची सुरुवात तेथूनच झालेली दिसते. त्याची पूर्णता पृथ्वीच्या कक्षात झाली आहे असं निदर्शनास येतं. म्हणजेच या सर्वांचा मृत्यू अप्रत्यक्षरीत्या का होईना अंतराळातच झाला. नवमस्थानाशी संबंधित हर्षल आणि प्लूटो हेही एक महत्त्वाचं कारण दिसून येतं. अत्यंत अप्रत्याशित फळं देणारे हे ग्रह जेव्हा नवमस्थानाशी कुयोग करतात तेव्हा असे विचित्र मृत्यू येऊ शकतात. याशिवाय राहू आणि केतू यांनी बनलेला कालसर्पयोग जेव्हा नवम आणि तृतीय स्थानातून होतो तेव्हाही असे योग दिसून येतात. 

अंतराळवीरांच्या कुंडलीतील दशम स्थान हाही एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. दशमस्थान हे कर्म स्थान आहे. अंतराळवीरांचा मृत्यू जेव्हा कामाच्या ठिकाणी म्हणजे कर्म करताना होतो तेव्हा दशमस्थानाशी किंवा दशमेशाशी त्याचा संबंध येतो. उदा: कल्पना चावला यांच्या कुंडलीत दशमेश नवमस्थानी आहे. म्हणजेच कार्यरत असताना त्यांचा मृत्यू दूरवर झाला होता हे सिद्ध होतं. हाच मुद्दा आणखी समजून घेण्यासाठी अभ्यासक संशोधक स्टिव्ह आयर्विन यांच्या कुंडलीचा विचार केला तर त्यांच्या कुंडलीत दशमस्थानी चंद्र आहे जो पाण्याचा कारक आहे. दशमेश बुध मंगळ,केतू आणि शनिने युक्त असा द्वितीयस्थानी आहे. बुधाची मृत्यूस्थानावर पूर्ण दृष्टी आहे. त्यामुळे जलचर प्राण्याच्या विषाचा त्यांच्या रक्तप्रवाह आणि हृदयावर परीणाम होऊन त्यांचा मृत्यू पाण्याखाली झाला. कार्यरत असतानाच त्यांचाही मृत्यू झाला ज्याचं कारण दशमस्थान व दशमेशाचे कुयोग हे होय. असो, केवळ अंतराळवीरच नव्हे तर कोणत्याही व्यक्तीचा कर्मस्थानी मृत्यू झाल्यास दशमस्थान हे महत्त्वाचं स्थान ठरेल. 

आता मुख्य मुद्दा आहे तो मृत्यूच्या स्थानाचा. अंतराळवीरांचा विचार करायचा तर त्यांच्या अवकाशातील मृत्यूचं स्थान कोणताही ग्रह नसून अवकाशाची अनंत पोकळी हे आहे, ज्याला वस्तुतः 'स्थान'ही म्हणता येणार नाही. याचे कारक ग्रह कोणते असावेत याचाही मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मते नवमस्थान जितकं महत्त्वाचं आहे तितकेच अवकाशाच्या कारक ग्रहांचे नवम स्थानाशी होणारे योग महत्त्वाचे आहेत. अवकाशातील मृत्यूमुळे अशीही एक शक्यता राहते की तिथे मरण पावलेल्यांचे मृतदेह हाती लागू शकणार नाहीत कारण ते अवकाशात विखुरले जाऊ शकतात. याचा विचार करता आकाश तत्वाचा ग्रह गुरू आणि वायू तत्वाचा ग्रह शनि हे ग्रह प्रथम विचारात घेतले जावेत. गुरू हा यानाच्या बनावटीसाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो आकाश तत्त्वाचा ग्रह असल्यानं अवकाशातील अस्तित्व त्याच्याच अधिपत्याखाली येईल. वायूतत्त्वाचा शनि अवकाशातील वायू, त्यांचा वेग आणि त्यातील घटक यांचा कारक होईल. तसंच शनि हा परीक्षा पाहणारा ग्रह आहे. अनेकदा अंतराळवीरांच्या मृतदेहाची वाईट अवस्था होते त्यालाही तो कारणीभूत असणार हे उघड आहे. तसंच शनि हा रूपानं काळ्या रंगाचा मानला गेलेला ग्रह आहे. यातील प्रतीकवाद समजून घेतला तर अवकाशातील अनंत काळा रंग हाही शनिचंच कारकत्व असू शकेल असं माझं मत आहे. तसंच शनि हा ग्रह अथांग, किचकट, अतर्क्य गोष्टीही दर्शवतो. त्यामुळे जर कधी दुर्दैवानं यानाचे, पर्यायानं अंतराळवीरांचे अवशेषच मिळाले नाहीत तर अशा गूढ गोष्टीही शनि (क्वचित कारकत्वानं शनिसारखेच असलेले राहू आणि केतू) मुळेच घडतील. जिथे कोणत्याही 'स्थानाचा' पत्ता लागला नसेल अशा अथांग ठिकाणी झालेला मृत्यू शनि सारख्या गूढ ग्रहांमुळे घडू शकेल असं माझं मत आहे.         

रवि म्हणजेच सूर्य, ज्याच्याभोवती परीभ्रमण करून आपली ग्रहमालिका जिवंत आहे, तो या सगळ्याचा कर्ता आहे. सूर्याच्या भोवती असलेलं  गुरुत्वाकर्षण, तापमान, हवा या सर्व गोष्टींवरही अवकाश यानांचं भ्रमण अवलंबून असतं. त्याचं गणित पाहता अवकाशातील अपघात पाहायचे असतील तर सूर्याचं कारकत्व विसरून चालणार नाही. मात्र यात एक मुद्दा खासकरून सांगावासा वाटतो. आपल्या अवकाशयानांची झेप अजूनही आपल्या ग्रहमालिकेतील काही ग्रहांपर्यंतच आहे. त्यामुळे अवकाशातील मृत्यू हा भाग आपल्या सौरमंडळातील सूर्यावरच अजून अवलंबून आहे. जर यापुढील दूरवरच्या ग्रहांवर मनुष्य जाऊ शकला तर आपल्या आकाशगंगेतील इतर सूर्यांचा विचार करता येईल. आणि त्यावेळी हवामान, पोकळी, हवेचे घटक आणि यानाचा वेग या सर्वांचीच गणितं बदलतील. तात्पर्यानं सध्यातरी रवि, गुरू आणि शनि या प्रमुख ग्रहांवर आणि दशम, अष्टम व नवमस्थानाशी संबंधित ग्रह - योगांवर अवकाशातील मृत्यूचं गणित अवलंबून राहील. कोणताही विशिष्ट एकटा ग्रहयोग याचं कारण बनू शकत नाही. मुळातच अशा फार कमी कुंडल्या असल्यानं अनुभव आणि ज्ञानाच्या सहाय्यानंच याचं भाकीत करता येईल.    
जसं आपण कुंडली बनवताना आपलं अस्तित्व पृथ्वीवर आहे हे गृहीत धरून गणित करतो तसंच हेलिओसेंट्रिक ज्योतिष पद्धती नुसार सूर्य हा ग्रह मानून त्याच्यावर अस्तित्व ग्राह्य धरलं जातं. अवकाशातील घडामोडींचा विचार करता सूर्याला मध्यस्थानी धरून कुंडली व ग्रहांचे अंश मांडले जातात. सूर्याच्या तुलनेत इतर सर्व ग्रहांची मांडणी केल्यास अनेक खगोलीय घडामोडींची गणितं सोपी झालेली पाहायला मिळतात. ही पद्धत अजून थोडी नवीन असली तरी त्याचा गणित आणि खगोल शास्त्रात निश्चितच उपयोग होतो. माझ्या मते ह्या पद्धतीचा अवलंब करून गणित मांडल्यास अवकाशातील मृत्यूचं कारण आणखी चांगल्या पद्धतीनं समजावून घेता येईल. पण ही पद्धत पूर्णपणे वेगळ्या सिद्धांतावर बनलेली असल्यानं त्याचा विचार मी इथे केलेला नाही.                          

अंतराळवीरांच्या कुंडलीतील महादशा आणि अंतर्दशांचा इथे कितपत संबंध जोडता येईल याची मला शंका आहे. त्यांच्या कुंडल्यातील महादशा ह्या त्यांचे सामुदायिक/ वैयक्तिक मृत्यू दर्शवतील. पण त्यातील गूढता मात्र महादशांमधून समजणार नाही. कारण वरील परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे आपल्या कुंडल्यांचं गणित पृथ्वीवरील मृत्यू बाबत प्रकाश टाकू शकतील. पण अंतराळातील मृत्यू आणि त्याचं नेमकं स्थान ह्यावर मात्र भाष्य करू शकत नाहीत. मात्र ह्यावरून मृत्यूची शक्यता वर्तवता येत असल्यानं यानाच्या उड्डाणाच्या आधीच याचा विचार करून वरील सर्व परीमाणांशी (विशेषतः चलित ग्रह आणि द्रेष्काण कुंडली) यांच्याशी त्याची जोडणी करता आली तर काही ठोस भाकीत करता येईल.

मी माझ्या अभ्यासामधून मला जे मुद्दे योग्य वाटले ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या विषयावर खूप कमी माहिती उपलब्ध आहे आणि आपलं विज्ञान अजूनही खूप पुढे जाऊ शकेल, यामुळे यातील मुद्दे काळानुसार बदलू शकतात ह्याची नोंद घ्यावी. 

मृत पावलेल्या सर्व अंतराळवीरांच्या धैर्याला माझा सलाम !!! 


© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
       =============================================

Death is the ultimate truth of our lives. Death can occur at any place due to any reason which is obviously not in our hands. The usual ways of passing we know are due to some imaginable reasons and importantly in the vicinity of the earth or below water etc. Today I am trying to delve into the deaths occurring at unusual places and write about it.  

When astronauts go into the space, they wear their suits like armor with bravery and valor, which is second to none. As far as I know, there are only 18 cases of space fatalities. In vedic astrology, not much information is available regarding these fatalities. So, which are some specific yog or planetary positions which can lead to such deaths? I am trying to put up my thoughts on this topic here.    

Well, space fatalities may seem to be an odd way of passing, but it comes under the section of accidental deaths. The reason behind it is these deaths occur mostly due to the technical faults of the spacecrafts. Now lets take a look at which are these technical faults and what are the consequences of that. 

1) On 24th April 1967 Vladimir Komarov from Soviet Union was travelling through Soyuz -1.  When the capsule began its descent and the parachutes failed to open, and the spacecraft hit the earth with the force of a meteorite. This unfortunately killed Komarov. 

                                            Komarov's remains

2) On 30th June 1971 Soyuz - 11 carried 3 astronauts, Georgy Dobrovolsky, Vladislav Volkov, and Viktor Patsayev which were found dead. Chair of the State Commission, recalled "Outwardly, there was no damage whatsoever". But later on the reason of the accident was revealed. The defective ventilation valve caused this accident and all of them died due to asphyxiation. Al three men were found in their couches, motionless, with dark-blue patches on their faces and trails of blood from their noses and ears.  Dobrovolsky's body was still warm, so these deaths occurred just before entering the Earth's atmosphere.      

3) On 28th January 1986 Challenger space shuttle broke apart 73 seconds into its flight, merely at an altitude of 15 kilometers (49,000 ft). All of the crew members including Gregory Jarvis, Christa McAuliffe
Ronald McNair, Ellison Onizuka, Judith Resnik, Michael J. Smith and Dick Scobee were killed in this disaster. Most of the crew members suffered due to hypoxia. Though some tried to activate their emergency oxygen, the cockpit hit the water at 320 km/h which killed the survivors if any. As this shuttle hit the sea, the remains of the astronauts were not fully recovered. 

4) On 1st February 2003 the Space Shuttle Columbia was lost as it returned from a two-week mission killing all of its crew members including Rick D. Husband, William C. McCool, Michael P. Anderson, David M. Brown, Kalpana Chawla, Laurel Clark and Ilan Ramon. In the atmospheric entry the space shuttle disintegrated. A defect in thermal protection system caused the accident by uncontrollable rise in the temperature and the space craft was broken apart. The pieces of the space craft were disintegrated. The point to be considered here is the fault in the thermal protection system was noticed beforehand but it was neglected by some reason. 

                                           Kalpana Chawla 

( I have provided this information in detail to make all readers aware of the names of these astronauts. Most of the Indians do not know these names except Kalpana Chawla. I have respectfully mentioned their names and the dates of their deaths to salute the bravery of these astronauts.)
Taking into account all these details, the exact launching time of the space shuttles is very important from astrological point of view. The astrological criteria we use for the travelling on Earth may not be much useful here. The Dreshkana kundli at the time of the space shuttle launch will be of utmost importance. Every Rashi has 3 Dreshkanas and thus a total of 36 Dreshkanas exist with their respective forms. During any travel if auspicious Dreshkana is on the rise it gives victory and a safe journey. An inauspicious Dreshkana can result in death or any other ill effects. When I calculated the Dreshkana kundli at the time of the launching of above mentioned 4 spacecrafts, a few important points were found to be critical. In the Dreshkana kundli at the launch of each space shuttle the eighth house, eighth house lord or Moon were debilitated. At the launching time of Soyuz - 1 and Challenger inauspicious Dreshkana was on rise. Along with this Saturn related to the eighth house found to be very malefic. In the Dreshkana kundli at the launch of Soyuz - 11, Saturn and Mercury in the eighth house and Mars and Rahu in the twelfth house created malefic yog. At the launch of Columbia, there were no auspicious yogas in the Dreshkana kundli and the Moon was debilitating. The planetary yogas at the beginning of any mission will affect till the end of the mission as the malefic results of these yogas can not be avoided once the journey has begun. 

Another important point to be considered in the space travel is the making of the spacecraft and it comes under the effect of which planets. Jupiter and Venus are the two planets which rule the making of the airplanes as well as spacecrafts. Mars and Saturn are not only important for machinery but also as significations of bones and blood in the human body. Considering the accidents of the above mentioned space shuttles, it can be observed that some of the shuttles hit the earth at a very high speed which proved to be fatal for the astronauts. In some cases the astronauts died due to the asphyxiation. These all results show the ill effects of malefic Mars and Saturn. In the latter cases impure blood flow and it's effect on the human heart seemed to be the reason for the fatalities. Nonetheless, when more than one astronauts travel in the spacecraft, it looks impossible to predict the number of deaths which can occur. If the space shuttle itself is devastated then all the crew members will die, so if major planets like Jupiter, Saturn and Venus make a malefic yog then only such prediction can be made.    

In the kundlis of the astronauts, the ninth house is very intrinsic. As a death related to this house usually occurs at a distant place. Now the deaths of the astronauts are not only 'distant' but they can be in the outer space. The main reason behind this is the malefic yog of the ninth house with the eighth house lord. Due to this yog, even if the actual death doesn't occur in the space, it's root cause like the fault in the space craft shows it's effect in the space and the result may occur anywhere from the space to the Earth's vicinity. This shows that even if not directly but the deaths occur in the space. Another important reason behind these fatalities is the relation of Uranus and Pluto with the ninth house. When such unpredictable planets make malefic yogas with the ninth house, such unusual deaths can occur. Also a Kalasarpa yog occurring with Rahu or Ketu placed in the ninth or third house can result in such deaths.   

The tenth house in the kundlis of the astronauts is also a very significant point to be considered. The tenth house is the house of deeds. So when astronauts die in the space i.e. at work place, the tenth house or tenth house lord comes into action. In the kundli of Kalpana Chawla the tenth house lord is situated in the ninth house, which supports the fact that she died at the place of work. Lets understand this point with the example of Steve Irwin's kundli. The famous zoologist and scientist had Moon, which rules water, in his tenth house. The tenth house lord Mercury is in the second house along with Mars, Ketu and Saturn aspecting the eighth house. Mercury is completely aspecting the eighth house. So Steve died underwater, due to the effect of the poison from the sting of the Ray which affected his heart. The malefic yogas of the tenth house and it's lord resulted in his death at his work place. Well, not only astronauts but when any person dies at the work place, the most important house to be considered is the tenth house.  

Now the most puissant point is the place of death. The 'place' of death of the astronauts (considered here) is the outer space which can not be even noted as a 'place' of death. I studied the planets responsible or ruling such kind of death. According to my study the planets with significations of space and their yogas with the ninth house are as vital as the ninth house itself. The space fatalities have one more bitter consequence that in some cases the remnants may not be recovered as they can be disintegrated in space. Considering this point the planets Jupiter (Akash tatva) and Saturn (Vayu tatva) are to be considered on the primary basis. Jupiter is not only important for the making of the spacecraft but it is equally vital being a planet of Akash tatva, as the existence in the space is ruled by Jupiter. The pivotal role by Saturn can not be forgotten as it being a planet of Vayu tatva it rules the air, composition of air and it's speed in the space. Saturn is a planet which tests the human life. So the severe condition of astronaut's body in the space obviously would betide due to the effect of the Saturn. Also Saturn is supposed to be the planet with a black coloured form in metaphorical explanation. Understanding this symbolism, the darkness in the space can come under the effect of the Saturn. Saturn is a planet which governs mysterious, complex or unfathomable things. So if unfortunately the remnants of the space shuttle or the astronauts are not recovered due to the disintegration in space, it can be the result of the malefic effects of the Saturn (or sometimes Rahu or Ketu). I feel when such unlucky deaths occur at such an infinite place where actual 'place of death' is unknown, then Saturn is the most likely planet to govern such events.   

Sun is the real 'star' of our planet Earth which gives life to our solar system. The gravity, temperature and atmosphere around the Sun is one of the important controlling factor of the spacecraft travel. While considering the spacecraft accidents we can not neglect these significations. I would like to highlight a point though. Our space shuttles have their leaps limited to our solar system. So the space fatalities are still contingent on the Sun of our solar system. If in future our science expands the horizons then other Suns in our galaxy can be taken into account. If it happens then the calculations of speed, air, vacuum and pressure will definitely change.  Practically at least today the calculations of space fatalities depend on the major planets like Sun, Jupiter, Saturn and the tenth, eighth and ninth house and the malefic yogas by the planets related to these houses. Any precise planetary condition can not be held responsible for the space fatalities. Basically astrologer's experience and knowledge will help to make such predictions due to the scarcity of these kind of kundlis. 

Heliocentric Astrology is a very recent development in celestial science which has a very different approach of considering Sun as the birth place in contrast to the Earth which is a common method. In this method Sun is taken as the center point for calculating the alignment of the planets. In my opinion if planetary alignments are with respect to the Sun, the calculations become more applicable. Though this is a fairly new approach, it is a very expedient method for astronomy and mathematics in astrology. I feel a calculation based on this method can help us to understand the reasons of space fatalities in a reformed way. As this method is based on a very different principle, I have not explained it in detail.       

I really doubt whether the Mahadasha and Antardasha part of astronauts' kundlis will be useful here. The calculations of Mahadasha may denote their personal or mass deaths. But the mystery of such deaths can not be revealed by the calculations. The reason behind it lies in the calculations based on the Earth as a base in our calculations which will shed light on the deaths on the Earth but not the space fatalities. I am skeptical about it's use in the prediction of space fatalities and finding the 'place' of deaths of the astronauts. Importantly it can predict the death of a particular astronaut, so it should be linked with the timing of the launch of the shuttle and other parameters (like Horary planets and Dreshkana kundli) to make any concrete prediction.  

Well, I have mentioned the points which raised through my study on this topic. As the information available for very limited and taking into consideration that the science can develop in future, these points are subject to change at any given time. I request the readers to note this point. 

I salute all the astronauts who lost their lives during such accidents and their bravery !!!

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
       ==============================================