Friday, 29 June 2018

प्रथमस्थान (लग्न स्थान) The first house:- Ascendant


जन्मकुंडलीतील प्रथम स्थानाला लग्नस्थान किंवा तनुस्थान असंही म्हणतात. या स्थानावरून त्या व्यक्तीचा स्वभाव, शारीरिक ठेवण, प्रकृती, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आयुष्यातले वेगवेगळे टप्पे, बौद्धिक क्षमता इत्यादींचा अभ्यास करता येतो. कुंडलीतील बारा स्थानांवरून वेगवेगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करता येत असला तरी प्रथम स्थानावरून एकूण आयुष्याचा अभ्यास करता येतो. आता प्रत्यक्षात याचा कसा उपयोग होऊ शकतो ते पाहू.  

जेव्हा दोन व्यक्तींमध्ये टोकाचे मतभेद होतात तेव्हा त्या व्यक्ती विशिष्ट प्रसंगी अशा का वागल्या हे प्रथम स्थानावरून सांगता येऊ शकेल. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन कसा आहे हे समजल्यावर अशा प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळू शकतील. यामुळे अनेक गोष्टींची सांगड घालता येईल आणि गैरसमज दूर होण्यासाठी मदत मिळू शकेल. 

लहानपणी घडलेल्या प्रसंगांचे परिणाम होऊन अनेकदा स्वभाव विचित्र बनतो. जेव्हा एखादी व्यक्ती चुकीच्या मार्गाचा अवलंब करते तेव्हा अशा प्रसंगांचा अभ्यास नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. स्वभावात कोरडेपणा असणे, एकलकोंडा स्वभाव, नैराश्य, दुष्ट वृत्ती किंवा गुन्हेगारी कडे वळणाऱ्या अनेक व्यक्तींनी लहानपणी वाईट आयुष्य भोगलेलं असतं. अशा कारणांचा शोध घेतला तर याबाबत काही मार्ग काढता येऊ शकेल. 

लहान मुलांच्या कुंडलीवरून त्यांच्या एकूण क्षमतेचा अंदाज आला तर त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा केल्या जाणार नाहीत. मुलांची क्षमता आणि त्यांच्या आवडीचं क्षेत्र कोणतं आहे याचा अंदाज घेऊन आणि विज्ञानाची मदत घेऊन (IQ test, समुपदेशन इ.) मुलांना योग्य पर्याय निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होऊ शकेल. 

विवाह जुळवताना प्रथम स्थान अतिशय महत्त्वाचं ठरतं. स्वभाव, दृष्टिकोन, क्षमता अशा अनेक गोष्टींवर वैवाहिक सौख्य अवलंबून असतं. अशा वेळी एक मार्गदर्शक म्हणून या शास्त्राचा वापर केल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरेल.

वैद्यकीय क्षेत्राचा विचार करता एखाद्या व्यक्तीची मानसिकता समजून घेण्यासाठी मानसशास्त्रा सारखाच ज्योतिष शास्त्राचा वापर करता येऊ शकेल. एखाद्या रोग्याची असंतुलित मानसिक अवस्था नक्की कोणत्या कारणांनी झाली आहे याचा शोध घेण्यासाठी कुंडलीतील प्रथम स्थानाचा अभ्यास उपयोगी ठरू शकेल. तसंच शारीरिक रोगांचाही विचार या स्थानावरून करता येईल. यामुळे रोग निदान आणि उपचार दोन्ही बाबतीत मदत होऊ शकेल. लग्न स्थानाचा अंमल शिरावर असतो. शरीरातील मुख्य भाग म्हणजे मेंदू ज्या भागी असतो त्यावर या स्थानाचा अमल असल्याने एकूण स्वभाव, वर्तणूक, मानसिक स्थिती याचा अभ्यास या स्थानावरून करता येतो. म्हणूनच मेंदू संदर्भातील आजार किंवा मानसिक विकार यांचा अभ्यास करून उपचार चांगल्या प्रकारे होण्यासाठी या शास्त्राची मदत होऊ शकेल. ज्या व्यक्तींना सुप्त आजार / विकार  आहेत त्यांनाही यामुळे निश्चित मदत मिळू शकेल. 
         
अशा पद्धतीने जन्मकुंडलीवरून आपण स्वतःला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना समजून घेतल्यास अनेक अडचणी दूर होतील. आपल्या आयुष्यातील बरेचसे प्रसंग हे स्वभावामुळे दिलेल्या प्रतिक्रियांचं प्रतिबिंब असतं. म्हणून जर मूळ स्वभाव आणि व्यक्तिमत्व समजून घेता आलं तर काही वाईट घटना नक्कीच टाळता येतील. 

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                     ======================================================

First house in the Janm kundli is known as Ascendant. From the Ascendant one's nature, physique, health, view towards life, different stages in life, intellectual capacity etc. can be studied. Though complete study of a person's life can be done by using all twelve houses in the Janm kundli, the overall life can be studied by the Ascendant. Now let's see how it can be used practically. 

When two persons have estranged relationships, then by studying the Ascendant it can be calculated that why they reacted in such a way at that particular point of life. By knowing the views of the persons such answers can definitely be found out. These answers can be linked to various behaviours and it can help in reducing some misunderstandings. 

A bitter past some times makes people behave oddly in their life. When some of these people choose a wrong path in life, such study can be very helpful. People with weird behaviours like rigid / extreme nature, social / emotional isolation, depression, evil nature or criminal mind mostly have a bitter past. If such peoples' backgrounds are studied carefully, it can definitely help them to improve their lives.   

If the parents come to know about the intellectual capacity of their children then they will not expect unreasonably from the children. Even the children can choose right career by knowing their capacity and liking along with the help of scientific tests like IQ test or career counselling. This will definitely reduce the stress on students' minds.    

Marriage is an important step in anybody's life. Thus when two persons want to stay together as a couple the study of Ascendant is very important. The stability of married life depends on the couple's views, nature, capacity etc. So if this science is used as a guideline it can be definitely helpful. 

In medical science, Astrology can be used just as Psychology to understand  one's mental status. If a patient is mentally disturbed, then the patient's history can be studied using the first house in Janm kundli. This can help to find the reasons behind the disturbance. Some physical ailments can also be known by the study of the Ascendant. This can help in diagnosis as well as treatment. Ascendant is said to govern the head of human body. As it governs the part where the most vital organ the brain is located, a person's nature, behaviour and mental status can be studied. This can help in improving treatments of brain diseases or psychological disorders. People with dormant or undiagnosable disease or disorder can also get help from such study to come to any conclusion.  
  
From Janm kundli if one understands his / her own nature as well as the nature of the loved ones it can help to remove many obstacles in life. Many incidences are actually a reflection of the reactions given due to one's nature. So understanding basic nature and personality can help to avoid some unnecessary problems in the relationships. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                       =======================================================

Friday, 8 June 2018

जन्मकुंडली मधील बारा स्थानं (Twelve houses in Janm Kundli)

ज्योतिष शास्त्रामध्ये खगोल शास्त्राची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आपल्या पृथ्वीभोवती असणारे महत्त्वाचे ग्रह, सूर्य तसेच अवकाशातील धूमकेतू सारख्या अनेक खगोलीय गोष्टींचा मनुष्यावर कसा प्रभाव होतो हे या शास्त्रामुळे समजून घेता येतं. या शास्त्राला सिद्धांत (गणित), संहिता (खगोलीय घटना), होरा, अशा प्रमुख शाखा आहेत. त्यातील होरा शास्त्र म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळी असलेल्या ग्रहस्थितीवरून त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या घटनांचा अभ्यास करणं. ही शाखा मनुष्याच्या आयुष्याशी निगडित असल्याने जास्त प्रमाणावर ह्या शाखेचा अभ्यास केला जातो. पण इतर शाखांच्या अभ्यासाशिवाय या शाखेचा अभ्यास करणं शक्य नाही. कारण गणित व खगोलीय घटना यांचा अभ्यास केल्याशिवाय कोणतंही भाकीत मांडणं अशक्य आहे.  

वैदिक ज्योतिषात होरा शास्त्र अनेक शाखांमध्ये विभागलं गेलं आहे. यातील जातक शास्त्र म्हणजेच जन्मकुंडलीवरून भाकीत करण्याचं शास्त्र सध्या जास्त अभ्यासलं जातं. पण होरा शास्त्राच्या इतर शाखांमध्ये ताजिक (वर्षफल), मुहूर्त, स्वर शास्त्र, अंकज्योतिष, नाडी ज्योतिष, स्वप्न शास्त्र, शकुन शास्त्र, प्रश्न कुंडली अशी अनेक शास्त्रं आहेत. 

मनुष्याची जन्मकुंडली बनवताना जन्मवेळचे ग्रह कुंडलीत मांडले जातात. कुंडली ही बारा भागांत विभागली जाते. त्या प्रत्येक भागाला भाव/स्थान किंवा घर असं म्हटलं जातं. प्रत्येक स्थानावरून काही विशिष्ट गोष्टींची माहिती मिळते. या बारा स्थानांची माहिती मी पुढील लेखांत सविस्तर देणार आहे. एखाद्या व्यक्तीची कुंडली मांडताना केवळ एकाच पद्धतीने न मांडता (पाराशर शास्त्रानुसार) सोळा पद्धतींनी मांडली जाते. त्यांना वर्ग कुंडली असं म्हटलं जातं. षोडश वर्ग म्हणजेच सोळा वर्ग कुंडल्या वेगवेगळ्या भाकितासाठी बनवल्या जातात. हे सोळा वर्ग म्हणजे लग्न, होरा, द्रेष्काण, चतुर्थांश, सप्तमांश, नवमांश, दशांश, द्वादशांश, षोडशांश, विशांश, चतुर्विशांश, सप्तविशांश, त्रिशांश,षष्टांश, खवेदांश आणि अष्टवेदांश. षोडशवर्ग कुंडल्यांचे चार उपवर्ग आहेत जे वेगवेगळ्या भाकितासाठी वापरले जावेत असे पाराशर शास्त्रात नमूद केले आहे. त्यातील लग्न, होरा, द्रेष्काण, नवमांश, द्वादशांश आणि त्रिशांश या सहा म्हणजे षड्वर्ग कुंडल्या जास्त प्रचलित आहेत. बाकी तीन उपवर्ग म्हंणजेच सप्तवर्ग, दशवर्ग आणि षोडशवर्ग सध्याच्या काळात जास्त प्रचलित नाहीत. 

जन्मकुंडली वरून नक्की कशा प्रकारची माहिती मिळू शकते याचा अंदाज अनेकदा प्रश्नकर्त्याला नसतो. त्यामुळे केवळ आपल्या अडचणींशी निगडित प्रश्न ज्योतिषाला विचारले जातात. कुंडलीतील प्रत्येक स्थान आणि त्याचं महत्त्व समजून घेतलं तर अनेक बाजुंनी प्रश्न विचारता येऊ शकतील जेणेकरून आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करता येईल. केवळ अडचण असतानाच जन्मकुंडली पाहावी असंही नाही. एक मार्गदर्शक म्हणूनही या शास्त्राचा वापर करता येईल.     

जन्मकुंडलीतील बारा स्थानं आणि त्यावरून विचारता येऊ शकणारे प्रश्न याचा आढावा पुढील काही लेखांत मी देण्याचा प्रयत्न करणार आहे.   

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                   ========================================================

Astronomy plays a very important role in Astrology. Important planets surrounding the Earth, Sun and other celestial bodies affect human life in different ways. This effect can be studied by Astrology. Astrology is mainly divided in Siddhant  (mathematics), Samhita (celestial events) and  Hora. Hora shastra is a branch of Vedic Astrology which deals with the position of planets at the time of birth of a person (horoscope) and their effect on that person's life. As this branch deals with the human life it is more popularly studied. Though it should not be forgotten that without the other two branches it is not possible to predict any thing from a horoscope. Without mathematics and study of celestial events it is merely impossible to study the effects of planets on any person's life. 


In Vedic Astrology Hora shastra is divided in different branches. In these Jataka Shastra (Natal Astrology) i.e. prediction from Janm kundli is a popular branch. Some of the other branches include Tajik, Muhurta, Swar shastra, Ank jyotish, Nadi jyotish, Swapna shastra, Shakuna shastra, Prashna kundli and many others.

In Janm kundli the positions of planets at the time of birth are written by using specific method. The Janm kundli is divided in twelve parts. Each part is known as Bhav/sthan or ghar (house). Every house is attributed to a specific part of the person's life. I will explain these twelve houses in detail later on in my articles. The Janm kundli is not written in a single fashion, but in sixteen different ways (Parashara Shastra- composed by great sage Parashar). These are known as Varg kundlis. Shodasha varg i.e. sixteen varg kundlis are calculated for different purposes. These sixteen vargas are Lagna, Hora, Dreshkan, Chaturthansh, Saptamansh, Navamansh, Dashansh, Dvadashansh, Shodashansh, Vishansh, Chaturvishansh, Saptavishansh, Trishansh, Shashtansh, Khavedansh and Ashtvedansh. These sixteen varg kundlis are divided in four subgroups known as upavarg which are used for specific purposes. Out of these six varg kundlis i.e Shadvarg are more popular in today's Astrology. These are Lagna, Hora, Dreshkan, Navamansh, Dvadashansh and Trishansh. The remaining three subgroups i.e. Saptavarg (seven kundlis), Dashvarg (ten kundlis) and Shodashavarg (sixteen kundlis) are not practiced in today's Astrology.         
Well many times the querent is unaware of the depth of astrology. So mostly the querents ask the questions related to their problems. If they come to know about the meaning of the twelve houses and their importance, then they can ask questions from different angles. It will not only help during difficult times but astrology can be used as a general guidance in life. 

In my next articles I will try and explain the importance of the twelve houses in Janm kundli and how the information can be used to get different predictions from Janm kundli.   

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
       
   ======================================================

Wednesday, 9 May 2018

परंपरा आणि आधुनिकता - एक सुवर्णमध्य (५) {Cultural Traditions and Modernization - A Golden Mean (5)}

घरातील देवपूजा असो किंवा मोठे सणवार, मनातील भक्तीभाव खूप महत्त्वाचा असतो. कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी कसे करायचे हे त्यांचा उद्देश आणि मनातील भावनेवर ठरतात. आज अनेक विधी, सणवार कसे साजरे करायचे याबद्दल दुमत आढळतं कारण त्यांचा उद्देश पूर्णपणे माहित नसल्याने विधींमध्ये बदल घडवला गेला नाही. जर असे बदल घडवले तर त्या विधींचं फळ मिळणार नाही असा एक समज आहे. मूळ उद्देशाला धक्का न लावता जर विधी काळानुसार बदलले तर त्यात काही अडचण येण्याची शक्यता नाही. पण यासाठी लागणारी जागरूकता अजूनही आपल्या समाजात आली नाही हे सत्य नाकारता येणार नाही. 

मी मागील लेखात लिहिल्याप्रमाणे कोणत्याही विधीचं मूळ समजून घेतलं तर तो विधी छोट्या किंवा मोठ्या प्रमाणावर योग्य पद्धतीने करून फळ नक्कीच मिळेल. उदाहरणार्थ मूर्तिपूजा घरात छोट्या प्रमाणावरही होते आणि गणेशोत्सवासारख्या मोठ्या पातळीवरही होते. मूर्ती हे गणपती ह्या दैवताकडून ऊर्जा मिळवण्याचं एक माध्यम मात्र आहे. तितक्याच भक्तीभावाने आपण मूर्ती समोर न ठेवता साधना केली तरी गणेशाकडून ऊर्जा मिळणारच आहे. मात्र त्यासाठी अध्यात्माच्या पुढील पातळीवर जाण्याची गरज आहे. कोणत्याही दैवताला विशिष्ट फूल का आणि कसं वाहायचं याची माहिती मिळाल्यास त्यामागील शास्त्रीय कारण समजून येईल. अशा अनेक छोट्या गोष्टींमागील कारणं समजून घेतल्यास त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावरील विधींसाठी वा सणवारासाठी करता येईल. तसंच ह्या विधींचा उद्देश समजून घेता आला तर कालबाह्य पद्धती मोडून नवीन पद्धती स्वीकारता येतील. जे बदल आज आवश्यक वाटतात ते काही वर्षांनी लागू पडतील असं नाही. म्हणून कोणत्याही विधीचा अट्टहास न धरता उद्देश साध्य करण्यासाठी जे बदल गरजेचे आहेत ते निश्चितच आमलात आणले गेले पाहिजेत. येणाऱ्या पिढयांना या विधींमागील उद्देश समजावून सांगण्यासाठी ते आपल्यालाही समजून घेता यायला हवेत. त्यानंतर सुसंवाद साधून यातून मार्ग निश्चित काढता येईल.  

काळानुरूप बदल म्हणजे नेमकं काय करायचं? तर आजच्या पिढीकडे कमी असलेला वेळ आणि मनुष्यबळ याचा विचार करून विधींमध्ये योग्य असे बदल घडवता येतील. मी मागील एका लेखात लिहिल्यानुसार अनेक विधींची सामुग्री आज उपलब्ध नाही. अशा वेळी त्याला पर्याय शोधला जायला हवा. अनेक शास्त्रोक्त ग्रंथांचं भाषांतर करताना आजच्या काळानुसार शब्द वापरले गेले तरच ते ग्रंथ नवीन पिढीला वाचावेसे वाटतील. कोणतीही अतिशयोक्ती न करता आणि अट्टहास न धरता विधी सांगितले जायला हवेत. अनेकदा नवीन पिढीतील वाचक अशी पुस्तकं वाचतात पण कठीण विधींना कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने ते विधी किंवा उपाय केलेच जात नाहीत. किंबहुना त्याबद्दलची माहिती नीट वाचली जात नाही. अध्यात्म, ज्योतिषशास्त्र किंवा वास्तूशास्त्र यांना न मानणे ही आधुनिकता समजली जाते. आपल्या संस्कृतीतील इतक्या शास्त्रोक्त गोष्टी जेव्हा परदेशात लोकप्रिय होतात तेव्हाच आपली नवीन पिढी तिकडे वळते. असं होऊ नये यासाठी नवीन पिढीला या शास्त्रांची तत्त्वं समजावून सांगून विचार करण्यास वेळ द्यावा. जेव्हा मनापासून ही शास्त्रं अवलंबिली जातील तेव्हाच त्यांचा खरा उद्देश साध्य होईल.        

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                       ======================================================

It may be daily worshiping or celebrating festivals, devotion is the most important factor. The protocols of divine rituals depend on the aim of the ritual and emotions of the worshipers. As many people are still not fully aware of the aim of the rituals, they hesitate to make any alterations in the protocols. This creates differences in the opinions. They think that the slightest alteration in the protocols of the rituals will not give results. Practically speaking if these alterations are made without affecting the aim of the ritual it should not create any problem. Sadly our society is not so open minded to accept these changes.  

As I mentioned in my previous article if we understand the aim of the rituals they can be properly performed on smaller or bigger scales with maximum effect. For example idol worshiping is performed at domestic level as well as in festivals like Lord Ganesha festival. The idol is just a medium to receive energy and positive frequencies from the deity. If Lord Ganesha is worshiped with full devotion and and dedication the worshiper will definitely get the energy from him irrespective of the idolatry. What it needs is the higher level in spirituality. If we understand the reason behind the offerings like different flowers to different deities,  we will come to know about the scientific base of this ritual. If all such small rituals are understood from the scientific point of view, they can be applied to bigger rituals or festivals. Also some old or obsolete rituals can be replaced with altered protocols. We should also note that the alterations applicable today may not be valid after some years. So rather than rigidly sticking to old protocols, the necessary alterations should be made and accepted with an open mind. If we want our new generation to understand the base of these rituals it is necessary that the earlier generation should know the principles behind our rituals. Then only with consonance the two generation can work on it with cohesion to find a golden mean.  

The question still remains that how can we find a golden mean? As we can observe that today's generation has less time and manpower due to nuclear family system. Then the alteration in the rituals can be made accordingly. I also mentioned in one of my earlier articles that the contents recommended in original protocols of the rituals may not be available today. In such cases some substitutes should be found out. Many texts are translated using old terminology, which should be changed according to time. The rituals should be written in a new format without any exaggeration and obstinacy. Some times readers from new generation do read the texts but due to lack of plausible theories the rituals are not performed. Rather I should say that the information is not read to full extent. Following spirituality, astrology or vastushastra is considered as a sign of orthodox or conservative behaviour. When the theories from these sacred texts become popular in western countries then only our new generation starts appreciating them. Thus the new generation should be made aware of the principles and scientific approach of our traditions. We should also give them enough time to think upon it and accept the traditions by understanding them and not by force.The goal of these sacred texts will be achieved when our traditions and shastras will be accepted unfeignedly.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.

   =======================================================

परंपरा आणि आधुनिकता - एक सुवर्णमध्य (४) {Cultural Traditions and Modernization - A Golden Mean (4)}

वास्तूशास्त्र आणि त्यासंबंधित काही मुख्य विधींबद्दल मी आधीच्या लेखांत माहिती दिली. घरामधे नियमित होणारी देवपूजा, व्रत वैकल्य, सणवार ह्याबद्दलही अनेक मतभेद आहेत. ह्या सर्व विधींमागील उद्देश आणि तत्त्वं समजून घेतली तर गरजेनुसार यांत बदल करून कोणतेही विधी व्यवस्थित पार पाडता येतील. 

घरात देव्हारा कसा असावा, देवांच्या मूर्ती किंवा प्रतिमा कशा ठेवाव्यात याची संपूर्ण माहिती शास्त्रीय ग्रंथांत मिळते. मुख्य प्रश्न असतो तो उद्देशाचा. मूर्तिपूजा हा तांत्रिक शाखेतील भाग असल्याने वैयक्तिक पातळीवर याचा उपयोग जास्त फलदायी ठरतो. वैदिक काळात देवतेलाकोणतंही मूर्त स्वरूप न देता आराधना केली जात असे. तंत्र शाखेत देवतांच्या गुणांनुसार त्यांना मूर्त रूप दिलं गेलं. देवतेची मूर्ती समोर ठेवण्याचं प्रमुख कारण म्हणजे मनाची एकाग्रता साधणे. प्रत्येक व्यक्तीला मन एकाग्र करून ध्यान धारणा करणं शक्य नाही. जर देवतेच्या इष्ट रूपातील मूर्ती समोर असेल तर मन त्या शक्तीवर एकाग्र करून आराधना करणं सोपं जातं. अध्यात्मात मूर्तीवर लक्ष एकाग्र करणे ही साधकाची पहिली पायरी आहे. त्यानंतर अध्यात्मात प्रगती साधून कोणत्याही मूर्ती शिवाय मानसिक उपासना करता येते. आपल्या संस्कृतीत मूर्तिपूजा अजिबात बंधनकारक नाही तर ती उपासनेची सुरुवातीची पातळी आहे. म्हणूनच मूर्तिपूजेचं कोणतंही अवडंबर न करता मनापासून इष्ट देवतेची उपासना केली तरी फळ मिळतंच. यासाठी आपल्या इष्ट देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा देव्हाऱ्यात ठेवताना आपली उपासना कोणत्या प्रकारची आहे याचा विचार करून निर्णय घ्यावा. 

जर चराचरात देव आहे तर देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणं गरजेचं आहे का? असाही एक प्रश्न नेहमी येतो. संपूर्ण पृथ्वीवर पाणी आहे पण कोणत्याही ठिकाणचं पाणी पिण्यायोग्य नसतं. त्यासाठी पाणी शुद्ध करणं गरजेचं असतं. तसंच चराचरात देव असला तरी त्याची ऊर्जा ही विशिष्ट रूपातच मिळते. म्हणून देवतेची मूर्ती समोर असल्यास अध्यात्माच्या सुरुवातीच्या पातळीवर फळ मिळतं. मूर्तिपूजा हा ईश्वराच्या उपासनेचा केवळ एक भाग आहे. "न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये, भावे हि विद्यते देवस्तस्माद्भावो हि कारणम् - या उक्तीनुसार देव हा लाकडात किंवा मातीमधे नसतो, तर भक्ती भावात असतो.  

घरातील नियमित देवपूजा हा सुद्धा उपासनेचाच एक भाग. आपण रोज स्नान करून कामाला सुरुवात करतो तसंच कोणत्याही देवतेच्या मूर्तीलाही स्वच्छ ठेवून प्रसन्न मनानं पूजा करावी. देवतेचा योग्य मान राखला जावा म्हणून देवपूजा करताना देवाच्या मूर्तीला पाण्याने स्वच्छ करणं, सर्व सोपस्कार करून वंदन करणं असे काही विधी आहेत. प्रत्येक देवतेसाठी असलेली वेगळी फुलं ही फुलांच्या रंग आणि रासायनिक गुणांवर आधारीत आहेत, जेणेकरून साधकालादेवतेची मूर्तीमधील तरंगरूपी ऊर्जा (पवित्रक) ग्रहण करता येईल. उदाहरणार्थ गणपतीला  जास्वंदीचं लाल फुल वाहिलं जातं. तेव्हा त्याचं देठ गणपतीकडे करून मग ते फूल त्याच्या चरणावर वाहावं. लाल रंगात आकर्षिली जाणारी ऊर्जा गणपतीच्या मूर्तीकडून साधकाकडे येते. गणपती ह्या देवतेची ऊर्जा इतर रंगांच्या फुलांपेक्षा लाल रंगाच्या फुलांमध्ये जास्त आकर्षिली जाते यासाठी गणपतीला लाल फूल आवडतं असा एक समाज निर्माण केला गेला आहे. अशा प्रकारे देवपूजनातील काही गोष्टींची तत्त्वं समजून घेतली तर त्या गोष्टी शास्त्रोक्त आहेत हे पटेल. 

घरात नियमित देव पूजन झालं तर देवतेची ऊर्जा घरात पसरते आणि वातावरण पवित्र राहतं. काही कारणामुळे नित्य नियमित विधिवत पूजन शक्य नसेल तर देवतेची मानसिक आराधना केली तरीही त्याची फळं मिळतात. त्याखेरीज आपलं चांगलं वर्तन, आपण करत असलेल्या कामाबद्दल निष्ठा आणि गरजू व्यक्तींना केलेली मदत ही सुद्धा ईश्वरसेवाच आहे. त्यामुळे नियमित देवपूजा व संध्याकाळची दिवेलागणी वेळेअभावी शक्य नसल्यास त्यामुळे काही अशुभ घडेल असं अजिबात नाही. पण घरात देव देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा असतील तर त्यांची स्वच्छता राखावी. त्यावर धूळ किंवा घाण बसणार नाही याची काळजी घ्यावी. 

स्त्रियांनी मासिक धर्माच्या वेळी देवाची कोणतीही उपासना करू नये किंवा देवळात जाऊ नये असाही एक समज आहे. यामागे स्त्रियांना शारीरिक विश्रांती देणे आणि मासिक धर्माच्या वेळी कोणत्याही देवतेच्या ऊर्जेमुळे शारीरिक त्रास होऊ नये एवढाच शास्त्रीय भाग आहे. मातृत्वासाठी जी गोष्ट निसर्गानेच स्त्रीला दिली आहे त्यामुळे स्त्री अशुद्ध होते असा अतिरेक करणं हे निव्वळ अवडंबर आहे. स्त्रीने या काळात पूजा केल्यास कोणतीही अनिष्ट गोष्ट घडणार नाही. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती व स्त्रियांवर घरातील कामांच्या खूप जबाबदाऱ्या होत्या. म्हणून मासिक धर्म असताना त्यांना शारीरिक श्रम पडू नयेत यासाठी विश्रांती दिली जात असे. तेव्हा घरातील इतर स्त्रिया कामाची जबाबदारी घेत असत. आताच्या काळात अशा गोष्टी करणं शक्य नाही. मासिक धर्म ही अशुद्धता नाही तर शरीरातील नको असलेल्या गोष्टींचा विसर्ग करण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून याचा कोणताही विपरीत अर्थ न घेता त्या काळात शारीरिक श्रमांवर मर्यादा आणल्यास स्त्रीला तिच्या प्रकृतीनुसार विश्रांती मिळू शकेल. मात्र याचा देवपूजनाशी संबंध जोडू नये. उलट या काळात स्त्रीला कोणत्याही कामात घरातील व्यक्तींनी मदत केल्यास ते जास्त योग्य ठरेल.          

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                         =====================================================

In my previous article I tried to explain the importance of Vastushastra and its applications. There are also some differences of opinions in daily rituals, worshiping of Gods and rituals in festivals. If we understand the principles behind these rituals, then it will be possible to make some alterations and perform the rituals.

Some authentic texts give information about how to keep a pooja ghar (chapel) at home and keep idols/photos of the deities in the pooja ghar. The most important thing to be understood is the aim of idolatry. Idolatry comes under the Tantra sect so it is more fruitful at individual level. In Vedic tradition there was no personification of any deity for worshiping. Tantra tradition emphasized on the personification of Gods. The main reason behind keeping an idol in front of the worshiper is to gain the concentration. Every worshiper can not concentrate the mind for worshiping or meditation. If an idol of the desired deity is put in front of the worshiper it becomes easy to get rid of other thoughts and concentrate on worshiping. In spirituality idolatry is just the first step to begin the meditation. In later stages it is possible to meditate without any medium like idol or photo of the deity. In Hinduism idolatry is not at all compulsory in fact it is the beginning. Thus rather than ostentation in idolatry, the deity should be worshiped with dedication and concentration to get desired results. If a pooja ghar or idols are to be kept at home then one should be clear about the concept of worshiping.  

If God is everywhere then why any idol or photo of God is required? Lets try and understand this. Earth is full of water. But we can not drink water from any water source like sea or pond. We need to purify the water and then we can consume it. Similarly, God is present everywhere but we need some medium to receive the energy in specific form. So an idol is recommended in the initial stages of meditation to receive the energy. Idolatry is just a part of worshiping. According to a text "God is not present in wood or stone, but he is there in the devotee's mind. After all it is the devotion which matters.

The daily worshiping of God is also a part of this devotion. We start our day by taking bath and getting cleaned. Similarly if idols are kept in the pooja ghar we should keep them clean. The rituals like cleaning the idols with fresh water, poojan and taking the blessings are recommended so the worshipers will not only give respect to this form of God but the cleansing of the idols and the surroundings will keep the mind pure. The type of flowers to be offered to the deity also depend on the flower's colour and chemical nature, which helps to transfer the frequencies (pavitrak) from the deity to the worshiper. For example red Hibiscus flower is offered to Lord Ganesha. The frequencies from the idol of Lord Ganesha are absorbed by red flower with maximum effect. This effect is not achieved by other coloured flower. The Hibiscus flower has to be offered with it's stem facing the idol which absorbs the frequencies and emits it from the front part which are received by the worshiper. Thus it is mentioned in the texts that Lord Ganesha likes red flowers. If such aspects of rituals are studied then it will be easy to understand that these rituals are based on natural principles. 

The daily worshiping of Gods emits positive frequencies and maintains the purity of the environment. If physical worshiping is not possible on daily basis, mental worshiping will also give positive results. Along with this our good behaviour, devotion towards work and helping the needy people is also a form of God worshiping. So if daily worshiping is not possible it will not create any ill effect per se. If idols of Gods are kept at home then it is advisable to keep them clean and tidy.           

Females are forbidden to worship God or get involved in any rituals during menstruation. The actual reason behind this forced isolation is to give women physical rest and avoid any effect like heat due to energies from worshiping. To consider menstruation which is a blessing given for motherhood as impurity is mere ostentation. Doing any divine rituals during menstruation will not create any ill effects. The origin of this forced isolation lies in the era where joint family system existed. Females had a lot of responsibilities at home. So during menstruation they were isolated to take rest and avoid physical stress. Other females from the family used to take the responsibilities on their shoulders. This is not possible in today's system of nuclear families. Menstruation is not an 'impurity' but it is a biological process to excrete unwanted material. So rather than misinterpreting it as 'impurity' women should take rest by understanding the natural reason behind it. It should not be related to any divine ritual. Rather it will be logical that in this period the family members share the work and let the females take rest. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                 ======================================================

Thursday, 3 May 2018

परंपरा आणि आधुनिकता - एक सुवर्णमध्य (३) {Cultural Traditions and Modernization - A Golden Mean (3)}

बाधिक वास्तू म्हणल्यावर सामान्यतः मनात एक भीती असते. ऐकीव माहितीवरून बाधिक वास्तूंबद्दल अनेक समज - गैरसमज आहेत. एखादी वास्तू बाधिक आहे किंवा तिथे पारलौकिक शक्तींचा प्रभाव आहे असं म्हटलं जातं तेव्हा सगळ्यात आधी त्याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे. वास्तू बाधिक होणं म्हणजे त्या वास्तूला काही अतृप्त किंवा वाईट वृत्तीच्या योनींमधील आत्म्यांची बाधा होणं. प्रामुख्याने अनैसर्गिक वा अपमृत्यू झालेल्या व्यक्ती, प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्ती आणि अभिचार कर्मं करणाऱ्या व्यक्तींना अशा योनी मृत्यूनंतर प्राप्त होतात. अर्थात अशा प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर जिवंत व्यक्तींना त्रास देण्याची शक्ती असतेच असं नाही. कधी कधी अभिचार कर्मं करणारे तांत्रिक अशा आत्म्यांना वशीभूत करून घेतात. ज्या वास्तूत अशा आत्म्यांचा जीव अडकलेला असतो, प्रबळ भावना असतात उदा: राग, बदला घेणे  इत्यादी किंवा माहितगार तंत्रिकांनी एखाद्या वास्तूच्या अकल्याणासाठी अशा आत्म्यांचा वापर केलेला असतो अशा वास्तू बाधिक असतात. ज्या जागांमध्ये हत्या/सार्वजनिक हत्या, अनेक व्यक्तींचा छळ, आत्महत्या अशा गोष्टी घडल्या आहेत त्या जागांवर बांधल्या गेलेल्या वास्तूंमध्ये पारलौकिक शक्तींचा प्रभाव जाणवतो. ज्या योनींमध्ये अशी शक्ती आहे अशाच योनीतील आत्मे त्रास देऊ शकतात. त्यामुळे ज्या वास्तूत पूर्वी वाईट प्रसंग घडले आहेत तिथे बाधा असेलच असं म्हणता येणार नाही. जगात आजवर अनेक व्यक्तींचे अपमृत्यु झाले आहेत. प्रत्येक अपमृत्यु झालेली व्यक्ती पिशाच्च किंवा तत्सम योनीत अडकून त्रास देत नाही.                

जेव्हा एखादी वास्तू बाधिक आहे असं म्हटलं जातं तेव्हा कधीकधी ती प्रसिद्धी साठी केलेली जाहिरात असते किंवा त्या वास्तूमधील लोकांना येणारे विचित्र अनुभव हे त्यांच्यातील मानसिक रोग किंवा अंधश्रद्धेमुळे एखाद्या घटनेचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे निर्माण झालेले गैरसमज असतात. म्हणून याची शहानिशा करून घेताना एखाद्या वास्तूचा/जमिनीचा भूतकाळ कसा आहे हे पाहतानाच तेथे येणारे अनुभव हे इतर कोणत्या कारणाने येत नाहीत ना याची खात्री पटल्यावरच याबाबतीत मतं मांडता येऊ शकतील. अनेकदा वास्तूमधे राहताना आधी कोणतेही विचित्र अनुभव येत नाहीत किंबहुना कोणत्याही विचित्र अनुभवाचा संदर्भ पारलौकिक शक्तींशी लावला जात नाही. पण जेव्हा ती वास्तू बाधिक आहे असं सांगितलं जातं त्यानंतर अनेक गोष्टींचा संबंध पारलौकिक शक्तींशी लावला जातो. आपल्या मनात असलेल्या भीतीमुळे अशी मानसिकता तयार होते. याचा फायदा घेऊन काहीवेळा अंधश्रद्धांना खतपाणी घातलं जातं. म्हणून अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यास आपले अनुभव खरंच पारलौकिक शक्तींमुळे येत आहेत की आपल्याकडून काही गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या नाहीत याचं नीट परीक्षण करूनच पुढील निर्णय घ्यावेत. याचं आणखी एक कारण म्हणजे काही अनुभव विज्ञानाच्या माध्यमातून समजून घेता येत नाहीत. जगातील कोणतंही विज्ञान निसर्ग, विश्व, मानवी शरीर, प्राणिमात्र यांचा संपूर्ण अभ्यास करू शकलेलं नाही. काही अज्ञात असलेल्या गोष्टींचा भविष्यात नवीन शोध लागल्यावर अर्थ लावता येऊही शकेल. पण सध्याचं विज्ञान याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही म्हणून त्याचा सरळसरळ पारलौकिक गोष्टींशी संबंध लावणं गैर आहे. अभिचार कर्मांमुळे वास्तूमध्ये जो त्रास होतो त्याचीही विज्ञानाशी सांगड घालता येत नाही. पण या सगळ्याचा अर्थ लावताना कोणत्याही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये.           

वास्तू खरंच बाधिक असेल तर ती कशी ओळखायची? तर वास्तूमध्ये मनःशांती कधीच मिळत नाही, उत्कर्ष होत नाही. तसंच घरातील लहान मुलं अनेक विचित्र अनुभव सांगतात किंवा विचित्र वागतात. घरातील व्यक्तींमध्ये आळस अकारण वाढतो, रोग होतात ज्याचं निदान होत नाही. घरातील लोकांना विचित्र स्वप्नं पडतात, विचित्र आवाज येतात व भास होतात, घरातली विजेची उपकरणं अचानक चालू किंवा बंद होतात. अशी लक्षणं जेव्हा दिसतात तेव्हा वास्तू बाधिक असू शकते. अभिचार कर्मांमुळे बाधिक झालेल्या वास्तूमध्ये अभिचार कर्मानुसार अनुभव येतात. अशा घरातील व्यक्ती कधी अचानक मृत्यू पावतात, वंश क्षय होतो किंवा काही व्यक्ती अतिमानवी शक्ती असल्यासारख्या वागतात. या सगळ्या लक्षणांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल की यातील  काही लक्षणं मानसिक रोगांची आहेत तर काही वेळा आपल्याच चुकीमुळे घरातील उपकरणं बिघडलेली असतात. काही रोग सवयींमुळे होतात तर काही निकृष्ट अन्नामुळे होतात. या सर्व गोष्टींची शहानिशा झाल्यावर जेव्हा कोणत्याही प्रकारे अशा अनुभवांचं उत्तर मिळत नाही तेव्हा वास्तू बाधिक आहे असं म्हणता येईल. याबद्दलचं पूर्ण ज्ञान असणाऱ्या व्यक्तीकडूनच याची खात्री करून घ्यावी. मात्र खात्री करताना एक गोष्ट ध्यानात असावी की पारलौकिक शक्तींचा अनुभव कोणत्याही वैज्ञानिक कसोटीवरून तपासता येत नाही. त्या वास्तूमध्ये सतत आलेले अनुभव आणि सर्व शक्यता पडताळून पाहून मगच याचा सारांश निघू शकतो. 

वास्तू बाधिक आहे हे सिद्ध झालं तर त्यावर उपाय नक्कीच आहेत जे सावधतेने अवलंबावेत. वैदिक आणि तांत्रिक शाखांमध्ये यावर अनेक उपाय दिलेले आहेत, ज्यांचा उल्लेख वास्तुशास्त्रातही होतो. कोणत्या प्रकारची बाधा आहे त्यानुसार होम, मंत्र पठण, पूजा, तांत्रिक उपाय अशा अनेक मार्गांनी यातून सुटका होऊ शकते. कधी कधी अशी बाधा फारशी शक्ती नसलेल्या काही योनींमुळे होते. अशा वेळी घरात नित्यनियमित देवपूजन, शुद्ध विचार आणि आचार यामुळेही अशी बाधा सहज दूर होते. अभिचार कर्मं तांत्रिक शाखेत येत असल्याने यामुळे झालेल्या बाधांचे उपाय तांत्रिक असतात आणि ते योग्य व्यक्तींनाच ठाऊक असतात. जर अशी कोणतीही बाधा असेल तर कुठल्याही जाहिरातीला बळी न पडता योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. पारलौकिक शक्तींमध्ये काही अशा शक्ती आहेत ज्यांच्या बाधेवर उतारा होत नाही. उदाहरणार्थ ब्राह्मसमंध ही अशी एक योनी आहे ज्याच्या बाधेवर फारसे उतारे उपलब्ध नाहीत. अशा वेळी मात्र ती वास्तू सोडून दुसऱ्या वास्तूत वास्तव्य करणं हेच योग्य ठरतं.            .                 

आजच्या पिढीला बाधिक वास्तू असणं हे थोतांड वाटतं कारण पारलौकिक शक्तींचे अनुभव वैज्ञानिक कसोटीतून सिद्ध करणं कठीण जातं. दुसरं कारण म्हणजे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अनेक वास्तू 'बाधिक' आहेत आणि त्यावर केवळ धार्मिक उपाय करून उतारा केला गेला असं अनेक ठिकाणी वाचनात येतं. पारलौकिक शक्तींबद्दल अतिशयोक्तीपूर्ण लिखाण, वाहिन्यांवरील कार्यक्रम किंवा चित्रपटांमधील अतिरंजित चित्रण यामुळे याबद्दलची शास्त्रोक्त माहिती मिळत नाही. म्हणूनच कोणताही अतिरेक न करता व अंधश्रद्धेच्या आहारी न जाता बाधिक वास्तूंची माहिती दिल्यास ती नवीन पिढीला नक्कीच पटेल. तसंच योग्य  मार्गांचा अवलंब करून आपल्या वास्तूची पवित्रता राखता येईल.  

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   

     =====================================================

The term haunted or possessed location usually creates a fear in our minds. Generally this kind of information is derived according to hearsay. So whenever any location is supposed to be haunted then it must be verified.  A location is haunted means it is infested by unsatisfied spirits or souls from evil yoni (realms), commonly known as ghosts. Mostly people who die untimely or unnaturally, who have extremely strong willpower and people doing abhichara karma enter into these troublesome yonis after death. Of course not all such people gain the powers to trouble living beings after death. Some times Tantriks doing fearsome sadhanas enchant weak spirits and exploit them to trouble others. Mostly the locations get haunted by following reasons. (a) When souls of the people who were residing in the location are still emotionally entangled (b) When people residing in the location have very strong feelings of rage/revenge and die suddenly with unfulfilled desires and (c) When some Tantriks exploit the souls to harm the location. The structures constructed on locations where foul or evil incidences like mass killings, tortures, murders or suicides have occurred are usually prone to paranormal activities. Only the souls from powerful yonis can harm the livings beings. So every location with such gory history can not be labelled as haunted or possessed. Many people in the world have met their untimely ends, but all such souls do not have powers to infest a location. 

Some times when locations are said to be haunted it is merely a publicity stunt. In some cases the weird experiences in the locations are the result of unusual behaviour of a person due to psychological disorders (psychotic episodes) which is interpreted from a superstitious point of view. Thus to confirm whether a location is really haunted, the history of the location is as important as to check whether the weird experiences are not caused due to any other reason. Some times people do not experience any weird incidences in the beginning, in fact I should say they don't relate the weird incidences with paranormal activities. But when they come to know that the place is haunted then they start relating every incidence with paranormal activities. The fear created by the hearsay can develop such kind of views and ultimately superstitions. So if any information regarding paranormal activities is given it should be verified whether the suspicious experiences are really due to infestation of souls/spirits or it is wrong interpretation due to negligence. One more reason is some weird experiences can not be understood using scientific criteria. The modern science has not discovered nature, space, human body or animals to full extent. New discoveries in future may provide scientific explanation for the things which are unknown today. But relating any such experience to paranormal activities due to lack of information is not advisable. The experiences caused in some locations due to Abhichar Karmas also can not be understood by scientific criteria. While interpreting any such experience, superstitions should be avoided. 

How to confirm whether a location is haunted? Well, in such location the residents are derived of mental peace and prosperity. Also small children in the house behave oddly or get some weird experiences. The elders feel lethargic without any significant reason or fall ill where proper diagnose is not obtained. The people get nightmares, hear weird sounds, get illusions or electric appliances suddenly start or stop working. These or similar symptoms may tell that the place is haunted. The places infested due to abhichar karmas may show the symptoms according to the ritual performed. Some of the symptoms are sudden death of a family member, stillbirths or some times a person in the family behaves like a superhuman with odd powers. If we consider all the above symptoms it is very necessary to keep in mind while interpreting that many of the symptoms are of psychological disorders. Or sometimes due to manual mishandling the electrical appliances do not work properly. Similarly some health issues occur due to addictions, bad eating habits or non nutritional food. When all these possibilities are considered and still there is no answer for any bad incidences then it can be confirmed that the place is haunted. For confirmation advise should be taken from a knowledgeable authority. It should also be noted that these symptoms of paranormal activities can not be defined by scientific criteria. The recurrent experiences and consideration of all other possibilities will only help to come to any conclusion. 

If it is confirmed that a location is haunted then there are certain remedies which can be followed with caution. Vedic and Tantric both sects provide some remedies which are also mentioned in Vastushastra. Depending on the type of infestation the remedies like homa, mantra, poojan or Tantric remedies can be followed. In some cases certain souls/spirits which are less powerful infest a location. In such cases daily worshiping of God, good behaviour and calm mind can help to get rid of them. Abhichar karmas come under Tantra tradition, so the well trained authority from Tantra tradition only knows the remedies on infestations caused by abhichar karmas. If any such infestation is confirmed then advise should be taken from an authority and falling prey to any advertisement should be avoided.  There are some kind of yonis or spirits which are so powerful that no remedy can help to get rid of them e.g. Brahmasamandh. In such cases leaving that place is advisable. 

Today's generation thinks that infestation of a place or haunted location is a hoax. The reason behind this is paranormal activities can not be proved on the basis of modern science. Secondly all over the world it is advertised that many places are haunted and the infestation was cleared with the help of religious remedies. This kind of advertisement sounds unthinkable. Exaggerated writings and television shows on paranormal activities or overstated presentations in films create misunderstandings rather than giving proper information on paranormal activities. If the factual information is provided without any superstitious view, the new generation will definitely understand and accept it. Also if proper remedies are followed in any place or house it's sacredness can be maintained.   

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                 =======================================================

Thursday, 26 April 2018

परंपरा आणि आधुनिकता - एक सुवर्णमध्य (२) {Cultural Traditions and Modernization - A Golden Mean (2)}

जुन्या आणि नवीन पिढीतील मतभेदांमधे दैनंदिन घरगुती विधींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. यातले काही विधी वैदिक आहेत तर काही तांत्रिक. या विधींच्या सखोल माहितीबरोबरच यांचा उद्देश समजून घेतला तर हे विधी नक्कीच चांगल्या पद्धतीने पार पाडता येतील. कोणताही विधी कसा करायचा याची माहिती अनेक ठिकाणी मिळू शकते. मात्र मूळ उद्देशच माहित नसेल तर त्यातलं गांभीर्य कमी होतं. काही अनुत्तरित प्रश्नांमुळे असे विधी किंवा एखाद्या देवतेची आराधना का करावी याबद्दल आजच्या पिढीचं मन साशंक आहे. पौराणिक कथांच्या माध्यमातून याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला जातो. पण पौराणिक कथा हे काही याचं उत्तर नाही किंबहुना आजच्या पिढीला ते पाटणारही नाही. अनेकदा पौराणिक कथांची व्युत्पत्ती ही लोकांनी ते विधी करावेत यासाठीच झालेली आढळते. एखाद्या देवतेचे चमत्कार, त्या देवतेच्या आराधनेमुळे एखाद्या काल्पनिक व्यक्तीची झालेली भरभराट, अनेक संकटांतून होणारी सुटका ह्या गोष्टी अशक्य कोटीतील वाटतात. पण विविध ग्रंथांचं वाचन किंवा पारायण करायला सांगताना अशा उदाहरणांचा दाखला दिला जातो. दैनंदिन विधी करतानाही अनेक व्यक्तींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या 'उपायांचा' उल्लेख केला जातो ज्यामुळे गोंधळ वाढतो. काही नेहमीच्या विधींबद्दल आणि त्यांच्या उद्देशांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू. 

आपण ज्या घरात राहतो त्या वास्तूच्या पूजेपासून विधींची सुरुवात होते. नवीन घर घेताना वास्तुशास्त्राचा वापर  किंवा घर घेतलं असेल तर त्यात करण्यात येणारे बदल हा मुख्य मुद्दा असतो. वास्तूपूजन अनेक विधींनी संपन्न केलं जातं. उदकशांति, गृहप्रवेश, वास्तुशांती, कलशपूजन, गणेशपूजन, अभिषेक, होम असे अनेक विधी यात येतात. प्रत्येक विधीसाठी काही पद्धती व नियम आहेत. याचा उद्देश हा  'वास्तू' म्हणजे ज्या घरात आपण राहतो किंवा राहणार आहोत त्या स्थानातील दोषांचं परिमार्जन करणे. वास्तुशास्त्रात आकाश, अग्नी, वायू, जल, आणि पृथ्वी या पंचतत्वांना विशेष महत्त्व आहे. आपण ज्या भूमीवर घर बांधतो त्यावर हवा, पाऊस, अग्नी, पाणी यासर्वांचा परीणाम होतच असतो. या तत्त्वांचं म्हणजेच निसर्गाचं पूजन करणं अगदी योग्य आहे. वास्तुशास्त्रानुसार निर्धारीत केलेल्या दिशा ह्या निसर्गाशी निगडित आहेत. उदाहरणार्थ घराचं मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असावं असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. पूर्व दिशेकडूनच सूर्याचा उदय होतो. सूर्योदयानंतर घरात जर सूर्यकिरणं पडली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. पूर्व दिशेला मुख करून कोणतंही काम केलं तर तशी ऊर्जाही त्या दिशेकडून मिळते. शरीरावर याचा चांगला परीणाम होऊन आपल्याला उत्साही वाटतं. म्हणून पूर्व दिशेला महत्त्व आहे. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये कारण ती यमाची दिशा आहे असंही वास्तुशास्त्रानुसार सांगितलं जातं. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र दक्षिणोत्तर आहे. आपला रक्तप्रवाह डोक्यापासून पायापर्यंत होत असतो. आपलं शीर उत्तर दिशेचं प्रतीक असल्याने जर उत्तरेला शीर असेल तर पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आणि आपलं शरीर दोघांची उत्तर दिशा एकच येत असल्याने दोन समान ध्रुवांमधील अपकर्षणाने रक्तप्रवाह नीट होत नाही. यामुळे निद्रानाश, रक्तदाब यासारखे विकार उत्पन्न होतात. वैज्ञानिक दृष्ट्या ह्या गोष्टी सिद्ध झाल्या असल्या तरी लोकांनी श्रद्धा ठेवून याचं पालन करावं म्हणून दहा दिशांचे दहा स्वामी सांगितले गेले आहेत. उदाहरणार्थ दक्षिण दिशेचा स्वामी यम, पूर्वेचा इंद्र इत्यादी. यामागे पौराणिक कथांचा संदर्भही दिला जातो. यामागे असणाऱ्या नैसर्गिक कारणांचं आकलन झालं तर पौराणिक कथांच्या संदर्भाची गरज भासणार नाही. हा प्रतीकवाद जर समजून घेतला तर त्याची विज्ञानाशी सांगड घालता येऊ शकेल. 

वास्तुशास्त्राप्रमाणे कटाक्षाने नियम पाळून एखादी वास्तू बांधली तर सर्व अडचणी दूर होतील का? असा एक प्रश्न पडतो. आपण राहतो ती वास्तू हा आपल्या आयुष्याचा केवळ एक भाग आहे. त्यामुळे केवळ वास्तुशास्त्राचा अवलंब करून अडचणी पूर्णपणे दूर होणं शक्य नाही. आपली कर्मं आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घटना घडणारच आहेत. पण जिथे प्रयत्न करूनही वास्तूमधील काही दोषांमुळे यश मिळत नाही किंवा त्रास होतो तिथे या शास्त्राचा उपयोग नक्की होऊ शकतो. उदाहरणार्थ जेव्हा दक्षिणेकडे पाय करून निद्रा घेतली जाते तेव्हा जे आरोग्याचे त्रास होतात ते औषधांमुळे कमी होत नाहीत तर झोपण्याची दिशा बदलून नक्कीच कमी होतात. अशा वेळी एक पूरक उपाय म्हणून वास्तूशास्त्राचा अवलंब फायदेशीर ठरेल. याचं वैज्ञानिक कारण समजून घेतल्यास असे बदल करणं म्हणजे अवडंबर आहे असा गैरसमजही दूर होईल. 

सध्याच्या काळात वास्तुशास्त्रानुसार योग्य असलेलं घर घेणं दर वेळी शक्य नसतं. किंवा घर घेतल्यानंतर त्यात मोठे बदल कारणंही फारसं शक्य नसतं. अशा वेळी या शास्त्राचा अवलंब कसा करायचा? तर मुख्य गोष्ट अशी लक्षात ठेवावी की आपलं भवितव्य हे केवळ वास्तूवर अवलंबून नाही तर आपल्या वर्तनावर अवलंबून आहे. त्यामुळे वास्तू कशीही असली तरी आपलं वर्तन योग्य असावं. वास्तू विकत घेताना व्यावहारिक गोष्टी नक्कीच पाहाव्यात. वास्तूमध्ये जर काही बदल करावेसे वाटले तर जेव्हढे बदल शक्य आहेत तेव्हढेच करावेत. वास्तुशास्त्राप्रमाणे दिलेले सर्वच बदल करणं आताच्या काळात अशक्य आहे. म्हणून वास्तुशांती किंवा एखादा होम जरूर करावा जेणेकरून वास्तू शुद्ध होईल. पण वेगवेगळ्या व्यक्तींचे सल्ले घेऊन घरात सतत बदल करणं अप्रस्तुत ठरेल. घरात एखादी वाईट घटना घडली तर त्याला केवळ वास्तुदोष कारण आहे असं मानणं चुकीचं आहे. आपल्या विधिलिखिताप्रमाणे एखादी घटना घडते आणि संयोगाने तेव्हाच नवीन वास्तू खरेदी केली असेल तर तो योगायोगही असू शकतो. वास्तूमध्ये कोणताही बदल करताना त्यामागचं कारण समजून घेऊन मगच बदल करावेत. वास्तुशास्त्राचा अतिरेक न करता ज्या अडचणी खरंच वास्तूमधील दोषांमुळे ( उदा: काही वास्तूंचे क्रमांक (घर/फ्लॅट नंबर) असे असतात जे काही लोकांनाच लाभतात.) किंवा चुकीच्या दिशेला काही गोष्टी असल्याने येत असतील केवळ अशा अडचणींसाठी या शास्त्राचा वापर करावा. सतत वास्तूदोष किंवा वास्तूसंबंधी शुद्धीकरण बाकी आहे असा विचार केल्यास मनही अप्रसन्न राहील. ज्यामुळे घरात वाईट ऊर्जा वाढेल. याउलट मन प्रसन्न ठेऊन आवश्यक तेव्हढेच बदल वास्तूमधे केल्यास त्याचा निश्चित चांगला परीणाम पाहायला मिळेल. जसं ज्योतिषशास्त्र हे एक मार्गदर्शक आहे तसंच वास्तुशास्त्र हे एक पूरक शास्त्र आहे. आपलं आयुष्य घडवताना वास्तूदोषांमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सहाय्यक म्हणून या शास्त्राचा वापर नक्की करता येईल. पण वास्तुशास्त्रामुळे आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल अशी अपेक्षा करू नये.

वास्तुशास्त्राचा संयमित वापर केल्यास त्याचा फायदा होईल यात शंकाच नाही. पण याला एक अपवाद आहे तो म्हणजे बाधिक वास्तू. एखाद्या वास्तूमध्ये किंवा त्या जागी पूर्वी असलेल्या एखाद्या वास्तूमध्ये अनेक वाईट घटना, हत्या, आत्महत्या झालेल्या असतात. ज्यामुळे अनेक विचित्र अनुभव त्या वास्तूत येत असतात. या बाधिक वास्तू कशा ओळखायच्या, यात कितपत तथ्य आहे आणि यावर काही उपाय करता येतील का याबद्दल पुढील लेखात माहिती देण्याचा प्रयत्न करेन.                 

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                 =================================================

The disputes between the earlier generation and the new generation commonly include the protocols of the rituals mostly daily rituals. Some rituals are Vedic while some are Tantric. Along with the detailed information of these rituals, if we understand the principles behind them then only performing these rituals will make sense. The detailed protocols of these rituals are available now a days. But if the purpose of the ritual is not known it may reduce it's seriousness. Today's generation is suspicious about these rituals or worshiping a deity, as many questions are still unanswered. These questions are many times answered by giving references of different mythological stories. Mythology is not the answer to the queries rather the new generation is not going to accept such answers as this reference has no scientific views. Many times we can observe that the mythological stories are created to make people believe in the rituals. The examples mentioned in mythology like miracles performed by a deity, sudden gain of prosperity by an imaginary person due to worshiping of a deity, overcoming impossible obstacles in life by worshiping a deity etc. sound unthinkable. Still such examples are given while reading some holy texts. While performing daily rituals various 'remedies' given by different people are taken into account which simply adds to the confusion. Well lets try and understand the principles and purpose behind some common rituals. 

The rituals start by the Poojan or worship of the land/ house (Vastu) where we stay or going to stay in future. The science or system of architecture is known as Vastushastra. The use of Vastushastra while purchasing a new house or changes made in a owned house according to Vastushastra are the most important points here. The worshiping of the Vastu is performed by different rituals like Udakshanti, Vastushanti, Kalash Poojan, Abhishek, Homa, Ganesh Poojan etc. Every ritual has a defined protocol. The purpose of these rituals is to remove any Dosha or defect of the Vastu. Vastushastra gives utmost importance to five basic elements i.e. Akash (sky/space), Agni (fire), Vayu (Air), Jal (Water) and Prithvi (Earth). The basic element Earth on which we construct our house is naturally affected by remaining 4 elements i.e. fire, water, air and sky. Worshiping of these elements i.e. nature itself is absolutely valid. The directions and their lords specified by Vastushastra are based on nature. For example Vastushastra says the main door of the house should be facing the East. As the Sun rises from the East, the early Sun rays falling in the house are definitely beneficial. If we work by facing East we get a positive energy. This energy and Sun rays are good for our health which make us more energetic. So East direction is important in Vastushastra. Another point in Vastushastra is we should not sleep with our feet facing South direction. Vastushastra says South is the direction of Yama, the God of death. The scientific reason behind this is the human body has a magnetic field with head as it's north pole. The Earth's magnetic field around us also has its north pole at north direction. So if we sleep with our head facing north then Earth's north pole and our body's north pole create a repulsive force as similar poles repulse each other. This disturbs the human blood circulation causing health issues like blood pressure, stress, insomnia etc. The synchronization of internal body clock is disturbed periodically. Though these facts are scientifically proved ten directions are allotted with ten lords (deities) in mythological texts to make people believe and follow the principles of Shastras. For example lord of South direction is Yama, lord of East direction is Indra etc. If the scientific aspects of the principles are understood there is no need of these mythological references. If we understand and interpret the symbolism correctly it can be linked to modern science easily.         

Well, if we strictly follow all the protocols in Vastushastra and construct a house will it solve all the problems in life? The Vastu or the house where we stay or work is a part of our life. Thus completely depending on Vastushastra is not going to solve all our problems. Our Karma is definitely going to reflect on our lives. Vastushastra can be useful where success is not attained in spite of putting all the efforts or some trouble is caused due to Vastu dosha or defects in the Vastu. For example if someone is sleeping facing the feet towards South direction and having blood pressure problems then this can be reduced or cured by changing the sleeping position. In such cases sometimes medicines do not work as internal body clock and blood circulation are disturbed. So Vastu tips can be used as a supplementary remedy for the problems. Understanding the scientific base of this shastra can also reduce the misunderstandings about this science.    

Today it has become almost impossible to buy a house or land according to Vastushastra. Making major changes in a already purchased house are also not possible every time. Then how to use Vastushastra in today's world? Then the first thing to remember is our life and future is not solely dependent on Vastu but it depends on our behaviour. So our behaviour should be good irrespective of our Vastu. While purchasing a house or land practical points can not be neglected. In spite of all if any changes are required according to Vastushastra then only possible changes should be made. Each and every correction according to  Vastushastra can not be done. To purify the Vastu, initially poojas or homas like Vastushanti should be performed. But taking advises from different authorities and making changes constantly is not advisable. If any bad incidence occurs in life then assuming that it has happened only due to Vastu dosha will not be a proper judgement. Some incidences occur in our life as per the destiny and  a new house is purchased in the same period it can be merely a coincidence. So any changes to be made in the house should be followed after knowing the reason behind it. Rather than blindly following or overusing Vastushastra one should apply the Vastu tips only when the problems are caused by Vastu dosha is confirmed. For example some flat numbers are not suitable for the owners or some things in house are kept facing the wrong directions which cause serious ill effects. One should try to remain happy in the house. If the people in the house keep thinking that there is Vastu dosha it will create negative energy in the house. If the people in the house keep their minds full of positiveness and make the necessary changes then it will definitely show good results. As Astrology is a guiding science, Vastushastra is a supplementary science. Vastushastra can be used to remove the ill effects due to Vastu dosha which create obstacles in life. But expecting that Vastushastra can create miracles and change one's life completely will not be correct.     

There is no doubt that proper use of Vastushastra can help in many ways. The only exception to this is haunted or possessed houses or locations. In some places a lot of foul incidences occur like suicides, murders etc. Later people in such places experience weird things happening or face a lot of problems in life. How to know that any location is haunted or possessed? How much factual it is? Is there any remedy on such paranormal activities? Lets try and get the answers in my next article.  

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                   ======================================================

Saturday, 7 April 2018

परंपरा आणि आधुनिकता - एक सुवर्णमध्य (Cultural Traditions and Modernization- A Golden Mean)

ज्योतिष शास्त्रात दिलेले उपाय असोत किंवा जुन्या रूढी परंपरा, आजची पिढी आणि आधीची पिढी यात हे उपाय, विधी, सणवार कसे करायचे याबद्दल दुमत आढळतं. नवीन पिढीचा ह्या सगळ्यावर विश्वास नाही आणि त्यामुळे देवाधर्माचं कार्य नीट पार पडत नाही असा आधीच्या पिढीचा समज आहे. आणि नवीन पिढीला हे बऱ्याचदा थोतांड वाटतं आणि जरी तथ्य वाटत असलं तरी सगळे यथासांग विधी करण्याइतका वेळ नसतो यामुळे आधीची पिढी जाचक वाटते. या सगळ्याबद्दल शास्त्र काय सांगतं आणि त्याचे कोणते परीणाम आहेत याची थोडी माहिती मिळाली तर असे गैरसमज नक्कीच दूर होतील. 

हे गैरसमज कसे निर्माण झाले आहेत याचा आढावा घेतला तर काही गोष्टी लक्षात येतात. आपल्याकडे रूढी परंपरा, घराण्याच्या चाली रीती अशा अनेक गोष्टींची सरमिसळ आहे. आधीच्या पिढीबद्दल बोलायचं तर एकूणच महत्त्वाकांक्षी लोकांची संख्या कमी होती. शिक्षण आणि अर्थार्जन यांतील संधी मर्यादित होत्या. स्त्रिया आर्थिक दृष्ट्या इतक्या स्वावलंबी नव्हत्या. त्यांना शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय यांची फारशी मुभा नसायची. आपलं कुटुंब सांभाळून त्या शिक्षण घेत आणि जमलं तरच अर्थार्जन करत. पुरुषांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोजकंच शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे कल होता. नोकरीत बढती मिळवणे किंवा उच्चशिक्षण याची ओढ कमी होती. यामुळे पूर्वापार चालत आलेल्या परंपरा सांभाळणं शक्य होतं. मुबलक वेळ आणि एकत्र कुटुंब पद्धती यामुळे यथासांग विधी करून एखादा सण किंवा व्रत वैकल्य केली जात असत. कोणत्याही पूजेची तयारी, नैवेद्य आणि स्वयंपाक यांची जबाबदारी स्त्रियांवर होती. स्त्रियाही सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असत. आताच्या पिढीनं हे सगळं लहानपणी पाहिलंही आहे पण काळ इतक्या झट्कन बदलला की या पिढीला हे सगळं करणं अशक्य होऊ लागलंय. आधीच्या पिढीला मात्र हा बदल पचवता येत नाही कारण त्यांनी हे सगळे सोपस्कार केले आहेत. मग आमच्या मुलांनी का करू नयेत असा प्रश्न त्यांना पडतो. स्त्रिया स्वावलंबी व्हायला लागल्या, परदेशात जाऊ लागल्या त्यामुळे या सोपस्कारांसाठी वेळ अपुरा पडू लागला. आर्थिक गणितं बदलली आणि महागाईमुळे स्त्रियांना नोकरी करणं अनिवार्य होऊ लागलं. आहे त्यात समाधान मानणाऱ्या आधीच्या पिढीला हे थोडं खटकायला लागलं. आजही अनेक मुलींना विशेषतः सुनांना घर सांभाळून नोकरी करण्याचा सल्ला दिला जातो. सुनांकडून विशेष अपेक्षा असतात. यात स्त्री वर्गाची फरफट होते आणि खटके उडायला लागतात. एकत्र कुटुंब पद्धती नसल्याने सगळी जबाबदारी एकट्या स्त्रीवर आली तर शारीरिक दृष्ट्याही ते कठीण होतं. 

या सगळ्या व्यावहारिक अडचणींमध्ये या दोन्ही पिढ्यांत एक वैचारिक मतभेदही आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. कोणताही विधी, पूजा, सणवार एका विशिष्ट पद्धतीनेच का करायचे? त्यात कालानुरूप बदल करता येणार नाही का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आधीच्या पिढीकडे नाहीत. केवळ आमच्या पूर्वजांनी सांगितलं म्हणून ते खरं आहे आणि तसंच झालं पाहिजे असा त्यांचा हट्ट असतो. कोणत्याही विधीची संपूर्ण माहिती नसल्यानं याची समाधानकारक उत्तरं त्यांना देता येत नाहीत म्हणूनच नवीन पिढीला त्या गोष्टींचं मूळ समजत नाही आणि ते थोतांड किंवा अवडंबर वाटतं. गणपतीला लाल फूल का वहायचं? उपवास का करतात? अशा साध्या गोष्टींपासून माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे विधी का करतात? इथपर्यंत कोणत्याही शंकेचं निरसन केलं जात नाही. आधीच्या पिढीने असे प्रश्न कोणाला विचारलेच नाहीत किंवा मोठ्यांच्या धाकामुळे त्यांना ते विचारता आले नाहीत. यामुळे निर्माण होणाऱ्या वैचारिक मतभेदांचं पर्यवसान हे या विधींवरच्या अविश्वासात होतं.       

भारतीय संस्कृतीत असणाऱ्या विधींना शास्त्रीय कारणं आहेत. त्यामागची तत्त्वं माहित नसल्याने काही शास्त्रीय विधी कायमचे नष्ट होतील की काय अशी भीती वाटते. या शास्त्रीय कारणांची माहिती नवीन पिढीला मिळाली तर आपली संस्कृती टिकून राहिलंच पण यामुळे येणाऱ्या पिढयांना त्याचा फायदाही होईल. नवीन पिढीची बदललेली जीवनशैली पाहता यातून काही सुवर्णमध्य काढता येईल का याचा विचार आता व्हायला हवा. या शास्त्रीय विधींसाठी लागणारं साहित्य आता उपलब्ध असेलच असं नाही. त्याला काही पर्याय शोधले जायला हवेत. शास्त्रीय माहितीच्या आधारे अशा सुधारणा करून आणि योग्य व्यक्तींचा सल्ला घेऊन जर असे विधी, उपाय किंवा दैनंदिन जीवनातील काही गोष्टी नवीन पद्धतीने करता आल्या तर दोन पिढ्यांमधला हा दुवा नक्कीच साधता येईल. अशाच काही विधींबद्दल आणि त्यात करता येण्यासारख्या बदलांबद्दल पुढील काही लेखांत माहिती देण्याचा प्रयत्न करेन.    

© ह्या लेखाचे संपूर्ण हक्क लेखिकेकडे आहेत. यातील कोणतीही माहिती किंवा संपूर्ण लेख लेखिकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही पद्धतीने वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. परवानगी हवी असल्यास shivsanchitam@gmail.com. या वर ई-मेल करावी.   
                           =======================================================

Today's generation and earlier generation always have disputes on how tocelebrate festivals, perform rituals or astrological remedies. The earlier generation thinks that the new generation does not believe in our tradition and our cultural or spiritual heritage is in danger. The new generation either thinks this is ostentation or has no time to perform the rituals and feels that the earlier generation is too taxing. If both generations are made aware of the principles behind these rituals and their effects, these misunderstandings can be definitely cleared. 

If we try to learn how these misunderstandings were created, then we realize certain issues. In our society there is a mixture of cultures, rituals and family traditions. In the earlier generation there were very few people who were really ambitious. There were limited opportunities in education as well as earning sources. Females were not completely independent and had many restrictions. The family was the priority for females and education or earning were only allowed if possible. Men used to take basic education and went for a job. Due to lack of ambitions many of them were also not keen about higher education or career prospects etc. The joint family system and availability of time were the reasons why the earlier generation could perform the rituals as per protocols. The females were taking the responsibility of the preparations for the rituals we well as cooking. The new generation has observed this system when they were young. In spite of this, the rapid change in the lifestyle has made it difficult for the new generation to follow in the parent's footsteps. The earlier generation could not digest this change as they have strictly performed all the rituals. So they think the next generation is giving excuses which they feel are questionable. As the females in new generation started getting independent and educated they found no time for these rituals.Due to inflation, now the females have to earn to run the families. This started the conflict between the self-satisfied earlier generation and the aspiring new generation. To a certain extent today also females are expected to work from home. The older generation expects more from daughter in laws. This leads to estranged relationships and particularly females suffer a lot. In this dilemma the females are still supposed to take all the responsibilities and increasing number of nuclear families are adding to the pressure on them.

Well in all these practical issues there is a conceptual misunderstanding which is a very important factor. Due to practical difficulties the new generation has some questions like "What is the principle behind the protocols of these rituals?" or "Can we alter these protocols periodically?". Frankly speaking the earlier generation can not answer these questions. They stick to their thoughts just because it was told by the ancestors. The lack of satisfactory answers to these valid questions make the new generation think that this is a hoax or ostentation, which is absolutely unnecessary. Even simple questions like why Lord Ganesha has be offered a red flower or why we keep a fast are not answered. Many people are still not aware of the importance of rituals after the death of any person. Either the earlier generation did not ask these questions to anybody or they could not ask their elders due to fear. Whatever may be the reason, the result of this conceptual difference is disbelief of the new generation on our traditional rituals.

Indian tradition and the rituals are based on valid scientific principles. The unawareness of the information regarding the principles is really taking our new generation away from our culture.If we can educate this generation about the traditions we will not only save our culture but it will also help the future generations in various ways. We should seriously think about finding a golden mean. The authorities in this field should come forward and help to alter the rituals without affecting the principles. For example the materials prescribed in the rituals may not be available today. If substitutes for such materials are derived from proper interpretation of the texts it will be possible to perform the rituals by new protocols with maximum effect. This will also help to avoid the misunderstandings between the two generations. I will try to elaborate some of these rituals and possible alterations in my next articles. 

© All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed or transmitted in any form without the prior written permission of the writer. For permission requests email to shivsanchitam@gmail.com.
                   ==================================================